श्रीगोंदे :- कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याची माहिती काढायची, कोर्टात याचिका दाखल करायची आणि स्वार्थासाठी आर्थिक तडजोड करुन नेतेगिरी करणाऱ्याला कायमचे घरी बसवा, असे आवाहन तेली समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत यांनी मंगळवारी केले.
काष्टी येथे भाजपचे बबनराव पाचपुते यांच्या प्रचारासाठी भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. विठ्ठलराव काकडे, सदाशिव पाचपुते, विजय भोईटे, बापूसाहेब हिरडे, काका रोडे, गणपतराव परकाळे, कुंडलिकराव भोसले, विठ्ठल गुंड, सुनील मगर, शांतिलाल खरात, आबासाहेब कोल्हटकर, सर्जेराव रंधवे, दत्तात्रय गायकवाड, नेमचंद बाबर, सुदाम पवार यावेळी उपस्थित होते.

भगवानराव पाचपुते म्हणाले, खरा विकास करणारा माणूस कोण आहे याचा विचार करा. पाच वर्षे सत्ता देऊन शेतीचे वाटोळे करणाऱ्याला नियतीने घरी बसवले. सत्तेवर असताना पाण्याचे नियोजन करता आले नाही.
साखर कारखाने बंद ठेवण्याची वेळ कोणामुळे आली, याचा मतदारांनी विचार करावा. निवडणूक आली की, आर्थिक तडजोडी करुन राजकारण करणाऱ्यांची दुकानदारी बंद करा, असे म्हणत त्यांनी घनश्याम शेलार व आमदार जगताप यांचा चांगलाच समाचार घेतला.
- अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा, श्रीरामपूरच्या ‘या’ सुप्रसिद्ध चित्रपट गीतकाराची कविता अभ्यासक्रमात
- अखेर ‘सिस्पे कंपनी’च्या संचालक मंडळावर सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ; जादा परताव्याच्या आमिषाने ४५० कोटींची फसवणूक
- अहिल्यानगरजवळ ‘या’ एमआयडीसीत सुरू होता पैसे छापायचा कारखाना, ५९ लाखांच्या बनावट नोटांसह अडीच कोटी नोटांचे साहित्य जप्त
- शिर्डीत “नक्शा” प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू ड्रोन सर्व्हेक्षणाद्वारे मिळकतींचे अचूक नकाशीकरण, नागरिकांना सहकार्याचे आवाहन
- प्रतीक्षा संपली ! ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार Vivo V60; 3 कलर ऑप्शन, 6500 mAh बॅटरी अन बरच काही….