श्रीगोंदे :- कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याची माहिती काढायची, कोर्टात याचिका दाखल करायची आणि स्वार्थासाठी आर्थिक तडजोड करुन नेतेगिरी करणाऱ्याला कायमचे घरी बसवा, असे आवाहन तेली समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत यांनी मंगळवारी केले.
काष्टी येथे भाजपचे बबनराव पाचपुते यांच्या प्रचारासाठी भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. विठ्ठलराव काकडे, सदाशिव पाचपुते, विजय भोईटे, बापूसाहेब हिरडे, काका रोडे, गणपतराव परकाळे, कुंडलिकराव भोसले, विठ्ठल गुंड, सुनील मगर, शांतिलाल खरात, आबासाहेब कोल्हटकर, सर्जेराव रंधवे, दत्तात्रय गायकवाड, नेमचंद बाबर, सुदाम पवार यावेळी उपस्थित होते.

भगवानराव पाचपुते म्हणाले, खरा विकास करणारा माणूस कोण आहे याचा विचार करा. पाच वर्षे सत्ता देऊन शेतीचे वाटोळे करणाऱ्याला नियतीने घरी बसवले. सत्तेवर असताना पाण्याचे नियोजन करता आले नाही.
साखर कारखाने बंद ठेवण्याची वेळ कोणामुळे आली, याचा मतदारांनी विचार करावा. निवडणूक आली की, आर्थिक तडजोडी करुन राजकारण करणाऱ्यांची दुकानदारी बंद करा, असे म्हणत त्यांनी घनश्याम शेलार व आमदार जगताप यांचा चांगलाच समाचार घेतला.
- MPSC Pashudhan Vikas Adhikari Jobs 2025: तुमचं अधिकारी होण्याचं स्वप्न साकार करा! MPSC द्वारे पशुधन विकास अधिकारी पदासाठी तब्बल २७९५ जागांची भरती सुरू
- कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली हे करणे सोपे नव्हते मात्र आपण ते करून दाखवले – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
- शेवगाव- पाथर्डी मतदारसंघातील ८३ तलाव होणार गाळमुक्त – आ. मोनिका राजळे
- लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी ! 2100 रुपयांचा हफ्ता कधीच मिळणार नाही ? सरकारमधील मंत्र्यांच्या विधानाने चर्चा
- ऊस आणि चारा पिके करपली, मुळाच्या पात्रात तातडीने पाणी सोडा ! शेतकऱ्यांची मागणी