संगमनेर :- भाजप-सेनेच्या भूलथापांना लोक कंटाळले असल्याने आभासी महायुती सरकारचा पराभव अटळ आहे. भावी मुख्यमंत्री आघाडीचाच असेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
राज्यात भाजप-सेनेच्या विरोधात वातावरण आहे. विधानसभा निवडणूक स्थानिक प्रश्नांवर होते. कर्जमाफी, वाढलेली महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवत ते काश्मीरसारख्या विषयावर भावनिक राजकारण करत होते.

जनादेश यात्रा काढून ते जनतेला आदेश देत होते. शिवसेनादेखील या सरकारबरोबर फरफटत गेली. सत्तेत राहून त्यांनीच त्यांच्या सरकारविरोधात केलेले शेतकऱ्यांसाठीचे कर्जमाफी आंदोलन जनतेने बघितले आहे, असे ते म्हणाले.
- श्रीगोंदा तालुक्यातील सिमेंट कारखान्याला शेतकऱ्यांचा विरोध, आमदार विक्रम पाचपुते यांची भूमिका संशयास्पद ?
- आठव्या वेतन आयोगाबाबत आताची सर्वात मोठी अपडेट ! आयोगाच्या अध्यक्षांचे नाव झाले फायनल, पॅनलची स्थापना कधी ?
- दहावी आणि बारावीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर ! 12 वी चा निकाल 13 मे रोजी आणि 10वी चा निकाल ‘या’ दिवशी लागणार
- पालकांनो! मुलांचे आधार वेळेवर अपडेट केलेत का? नाहीतर शैक्षणिक आणि सरकारी कामात येवू शकते अडचण
- अहिल्यानगर महानगरपालिकेकडे शिक्षकांचे ५ महिन्यांचे पगार रखडले! हप्ता थकला, सिबील झाला खराब, घर चालवण्यासाठी आली उसनवारीची वेळ