संगमनेर :- भाजप-सेनेच्या भूलथापांना लोक कंटाळले असल्याने आभासी महायुती सरकारचा पराभव अटळ आहे. भावी मुख्यमंत्री आघाडीचाच असेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
राज्यात भाजप-सेनेच्या विरोधात वातावरण आहे. विधानसभा निवडणूक स्थानिक प्रश्नांवर होते. कर्जमाफी, वाढलेली महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवत ते काश्मीरसारख्या विषयावर भावनिक राजकारण करत होते.

जनादेश यात्रा काढून ते जनतेला आदेश देत होते. शिवसेनादेखील या सरकारबरोबर फरफटत गेली. सत्तेत राहून त्यांनीच त्यांच्या सरकारविरोधात केलेले शेतकऱ्यांसाठीचे कर्जमाफी आंदोलन जनतेने बघितले आहे, असे ते म्हणाले.
- साईबाबा संस्थानची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार !
- दूध डेअरी चालू करण्यासाठी माहेरहून १० लाख रूपये न आणल्यामुळे विवाहितेला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण
- कोणत्याही महिन्यांच्या ‘या’ तारखांना जन्मलेली मुलं असतात मम्माज बॉय ! आईला कधीच एकटं सोडत नाहीत, प्रचंड श्रीमंत होतात
- Post Office च्या 24 महिन्यांच्या एफडी योजनेत 1,00,000 रुपयाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- संगमनेर तालुक्यातील भोजापूर धरण यंदा जून महिन्यातच १०० टक्के भरलं, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण