अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलाच्या कामाची सुरुवात महिनाभरात करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी मािहती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.
शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भात खासदार डाॅ. विखे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू होण्यासंदर्भात मागणी केली. याबाबतचे निवेदनही त्यांनी मंत्र्याना दिले. याबाबत गडकरी यांनी उड्डाणपुलाच्या कामाची वस्तुस्थिती जाणून घेतली.


या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असताना केवळ भूसंपादनाच्या कारणामुळे हे काम सुरू होऊ शकत नसल्याची बाब खासदार डाॅ. विखे यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली.
उड्डाणपुलाच्या कामासाठी काही ठिकाणी बाकी असलेल्या भूसंपादनाचा कोणताही अडथळा कामात येऊ न देता या कामाला सुरुवात करून, राहिलेले भूसंपादन सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देशही गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले असल्याचे डाॅ. विखे यांनी सांगितले.
नगर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता.लोकसभा निवडणुकीच्या निमिताने या कामाला प्राधान्य देऊन मार्गी लावण्याचा शब्द आपण दिला होता. त्याची प्रत्यक्ष सुरुवात आता झाली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घेतलेले सकारात्मक निर्णय नगरकरांना दिलासा देणारे असल्याचे विखे यांनी सांगितले.
- करोडपती बनवणारा शेअर….; 8.15 रुपयांच्या स्टॉकची किंमत पोहोचली 1,500 रुपयांवर ! एक लाख रुपये गुंतवणारे सुद्धा झालेत करोडपती
- छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी ! शिर्डीसाठी सुरू झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट?
- तुमच्या नावावर जमीन किंवा प्लॉट आहे का ? मग केंद्र सरकार देणार घर बांधण्यासाठी पैसे, कसा करायचा अर्ज ?
- पुरंदर, सातारा पाठोपाठ आता महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला पण मिळणार आयटी पार्क ! राज्यातील हजारो तरुणांना मिळणार जॉब
- पुणे ते जळगाव प्रवास होणार फक्त 3 तासात ! तयार होणार नवीन एक्सप्रेस हायवे , कसा असणार रूट?













