नगर :- शहरातील गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय मी राहणार नाही. कसले गुंड, कोण गुंड? या गुंडांची तुमच्या पायाशी उभे राहण्याचीही लायकी नाही. एका बाजूला आपले अनिल राठोड व दुसऱ्या बाजूला जो गुंड असेल त्याने याद राखावे, यापुढे गुंडागर्दी केली, तर बोलून दाखवणार नाही, करून दाखवेन, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचे नाव न घेता दिला.
शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ नंदनवन लॉन येथे आयोजित प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे भाऊ कोरगावकर, खासदार सुजय विखे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, मिलिंद नार्वेकर, तेजस ठाकरे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शिला शिंदे, सुरेखा कदम, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यापूर्वी मी खासदार सुजय विखेंबद्दल ऐकले होते, आज अनुभवयास मिळाले. अभिषेक कळमकर यांनी मनावर दगड ठेवून निर्णय घेतला. हे कुटुंब तुम्हाला जपून पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. राठोड यांच्या वचननाम्यातील गुंडागर्दीबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, शहरातील गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय मी राहणार नाही.
या गुंडाची तुमच्या जोड्यापाशी उभे राहण्याची लायकी नाही. असे नगरचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाणार का? अनिलभय्या जिंकले किंवा हरले हा प्रश्न नाही. हा प्रश्न नगरकरांच्या अब्रूचा आहे. एका बाजूला राठोड, तर दुसऱ्या बाजूला जो कोणी गुंड असेल त्याने यापुढे गुंडागर्दी केली तर याद राखावे.
पुढचे बोलत नाही, मी करून दाखवेन. शिवसैनिकांची हत्या झाली होती, त्यावेळी आलो होतो. ही हत्या मी विसरू शकणार नाही. मी सुडाने वागत नाही, ती आमची शिकवणही नाही, पण अन्याय करणार नाही अन् सहनही करणार नाही. अन्याय केला, तर कोणीही असला, तरी त्याला तोडूनमोडून टाकेन, असा ते ठाकरे शैलीत म्हणाले.
- पोस्ट ऑफिसची गृहिणींसाठी खास बचत योजना ! एकदा पैसा गुंतवला की दर महिन्याला मिळणार ‘इतकं’ व्याज
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कुटुंब पेन्शनच्या नियमांमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा बदल, आता….
- वादळी पावसाचा मुक्काम वाढला! आता ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, हवामान खात्याचा नवा अंदाज चिंता वाढवणारा
- मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय ! आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध अधिकार असतो का ? न्यायालय सांगते….
- काय सांगता ! ‘हा’ आहे भारतातील सर्वात मोठा जिल्हा, दिल्लीपेक्षा 31पट अधिक क्षेत्रफळ













