अहमदनगर :- गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून शिवसेनेचे विचार घेऊन काम केले. प्लॉट, खंडणी, दहशत २५ वर्षे बंद होती, पण मागील पाच वर्षांत शहराचा चेहरा बदलून त्याचा बिहार झाला आहे.अशी टीका माजी आमदार अनिल राठोड यांनी केली.
नंदनवन लॉन येथे आयोजित प्रचार सभेत राठोड बोलत होते, शहराला संरक्षण देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. विकास हा स्थायी होणे आवश्यक आहे. तो शिवसेनेने केला शहरात एक नाही, तर तीन उड्डाणपुलांची गरज आहे.

आता जनताच लोकप्रतिनिधी होणार आहे. २५ वर्षांचा सुवर्णकाळ होता. हा काळ पाच वर्षे झाकोळला गेला होता, म्हणून हे वैभव पुन्हा उभे करायचे आहे. शहराला लाल दिवा देण्याचे आश्वासन दिले आहे.” असे त्यांनी बोलताना सांगितले.
- महाराष्ट्राला लवकरच मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ भागात विकसित होणार 491 कोटी रुपयांचा नवा रेल्वे प्रकल्प
- फिल्मस्टार प्रसिद्धीसाठी धारण करतात ‘हे’ रत्न; किंमतही एवढी की, सामान्यांनाही परवडते
- ‘या’ छोट्या प्रयोगाने समजते तुम्ही आणलेल पनीर खरे आहे की भेसळ? फुकटात होऊ शकतो प्रयोग
- धरणातील गाळ काढण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण करा- विखे पाटील
- महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी सरकारची नवीन नियमावली जाहीर !