अहमदनगर :- गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून शिवसेनेचे विचार घेऊन काम केले. प्लॉट, खंडणी, दहशत २५ वर्षे बंद होती, पण मागील पाच वर्षांत शहराचा चेहरा बदलून त्याचा बिहार झाला आहे.अशी टीका माजी आमदार अनिल राठोड यांनी केली.
नंदनवन लॉन येथे आयोजित प्रचार सभेत राठोड बोलत होते, शहराला संरक्षण देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. विकास हा स्थायी होणे आवश्यक आहे. तो शिवसेनेने केला शहरात एक नाही, तर तीन उड्डाणपुलांची गरज आहे.

आता जनताच लोकप्रतिनिधी होणार आहे. २५ वर्षांचा सुवर्णकाळ होता. हा काळ पाच वर्षे झाकोळला गेला होता, म्हणून हे वैभव पुन्हा उभे करायचे आहे. शहराला लाल दिवा देण्याचे आश्वासन दिले आहे.” असे त्यांनी बोलताना सांगितले.
- मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दुहेरी कोंडी; सीटीईटी परीक्षा की निवडणूक कर्तव्य?
- प्रायव्हेट जेट बुक करणं सामान्य माणसालाही शक्य? जाणून घ्या खर्च, प्रक्रिया आणि वास्तव
- आयुष्मान भारत योजना : ७० वर्षांवरील नागरिकांना कसा मिळतो १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ?
- वारकऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूर नियमित रेल्वेची जोरदार मागणी; कायमस्वरूपी एक्स्प्रेस कधी सुरू होणार?
- अचानक श्रीमंतीची संधी? या ग्रीन एनर्जी स्टॉकमध्ये उसळी, मार्केटमध्ये खळबळ













