मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडीकडून अनेक तरुण मैदानात उतरले आहेत. या युवा नेत्यांना जनतेकडून काय प्रतिसाद मिळणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र, राज्याच्या राजकारणात अनुभवी नेत्यांसोबतच युवा नेत्यांची गरज आहे.
अशावेळी अनेक युवा नेते आपले नशिब आजमावत आहेत. आजची युवा नेते तंत्रस्नेही असल्याने त्यांचा वावर सोशल मीडियात पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांची युवा वर्गात मोठी चर्चा होताना दिसते. त्याचमुळे अनेक ठिकाणी ज्येष्ठांची मक्तेदारी मोडीत काढत तरुणतुर्क नेत्यांनी विधानसभेच्या रणांगणात आपला शड्डू ठोकला आहे.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे रोहित पवार, काँग्रेसचे धीरज देशमुख, कोल्हापूरमधील काँग्रेसचे ऋतूराज पाटील, सांगोल्यातील डॉ. अनिकेत देशमुख, श्रीवर्धनमधून आदिती तटकरे, बीडमधून संदीप क्षीरसागर, मुक्ताईनगरमधून रोहिनी खडसे, भाजपचे राम सातपुते आदी युवा मंडळी पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
- पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !
- महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विमानतळासारखे भव्य बसस्थानक ! 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर
- इंजिनिअर बनायचंय ? मग सिव्हिल, मेकॅनिकल सोडा ‘या’ ब्रांचमधून इंजिनिअरिंग करा, लाखो रुपयांच्या पगाराची नोकरीं मिळणार
- पुण्यातील दक्षिण आणि उत्तर भागाला जोडणारा नवा मार्ग तयार होणार ! ‘या’ भागात विकसित होणार 20 किलोमीटर लांबीचा बोगदा
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी ! 15 जून पासून ‘हा’ नवीन निर्णय लागू होणार