कोपरगाव :- पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याकडून माझ्या नावाचा निष्कारण घोष चालू आहे. झोपेतसुद्धा ते माझेच नाव घेत असतील, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोपरगाव येथील सभेत बोलताना भाजपच्या अनेक नेत्यांची खिल्ली उडवली.
राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ पवार आले होते. हा तरुण या भागाच्या विकासासाठी झटत आहे. अशा तरुणांची खरोखर देशाला गरज आहे. या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना संपवण्याच्या हालचाली सुरु आहेत, परंतु अशा कारवायांमुळे आम्ही डगमगत नाही, असेही पवार म्हणाले. कश्मिरचा मुद्दा भाजपने प्रचारात आणल्याबद्दल त्यांनी टीका केली.
आशुतोष काळे यांनी शरद पवार यांचा शेतकऱ्यांचे कैवारी असा उल्लेख करुन आता परिवर्तन घडेल, असा विश्वास व्यक्त केला. आमदारांच्या चुकीच्या धोरणावर टीका करताना जसे सरकार तसे हे लोकप्रतिनिधी अशी कोपरखळी त्यांनी मारली.
शंकरराव काळे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोक काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, मंगेश पाटील, डॉ. अजेय गर्जे, चैताली काळे, पुष्पा काळे आदी यावेळी उपस्थित होते.
- महाराष्ट्र किंवा गुजरात नाही तर ‘या’ प्रदेशात आहे देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन! जबरदस्त टेक्नॉलॉजीमुळे ठरते सर्वात खास
- नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? मग थोडं थांबा! पुढच्या आठवड्यात ‘या’ 3 दमदार स्मार्टफोन्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट
- देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा, पेन्शनबाबत समोर आली आनंदाची बातमी! वाचा काय बदल होणार?
- जिओ वापरकर्त्यांसाठी धमाका प्लॅन्स! 24GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि…; फक्त ‘इतक्या’ रुपयांत
- महाराष्ट्रालाही टाकलं मागे! भारतातील ‘हे’ राज्य आहे सर्वात हुशार, येथील प्रत्येक विद्यार्थी आहे स्मार्ट; IQ लेव्हल ऐकून तर थक्क व्हाल