निघोज :- जनसंवाद यात्रेत जनतेचे दु:ख मला समजले. पाणी, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न मी सोडवणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांनी सांगितले.
माजी राज्यमंत्री अशोक सावंत, प्रभाकर कवाद, दादा कळमकर, मधुकर उचाळे, सरपंच ठकाराम लंके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी कळमकर, अनंतराव वरखडे, सुवर्णा मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा घोगरे यांचीही भाषणे झाली.

सभेअगोदर पदयात्रा काढण्यात आली. बाळासाहेब लामखडे व विकास शेटे यांनी सूत्रसंचालन केले. मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त शंकरराव लामखडे व विश्वास शेटे यांनी आभार मानले.
- फेब्रुवारी 2026 स्मार्टफोन बाजारासाठी ‘हॉट’ महिना; फ्लॅगशिपपासून प्रीमियम मिड-रेंजपर्यंत अनेक मोठे लॉन्च
- अर्थसंकल्पाच्या आधीच सोन्या-चांदीला मोठा धक्का; वायदा बाजारात लोअर सर्किट, सामान्य ग्राहकांना दिलासा
- शेअर बाजारात विशेष व्यापार सत्र, गुंतवणूकदारांचे लक्ष ठरलेल्या टॉप स्टॉक्सकडे
- आयफोन 16 आजही लोकप्रिय; जगात आणि भारतात सर्वाधिक विक्रीचा दावा
- मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांवर कडक निर्बंध लागू













