निघोज :- जनसंवाद यात्रेत जनतेचे दु:ख मला समजले. पाणी, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न मी सोडवणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांनी सांगितले.
माजी राज्यमंत्री अशोक सावंत, प्रभाकर कवाद, दादा कळमकर, मधुकर उचाळे, सरपंच ठकाराम लंके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी कळमकर, अनंतराव वरखडे, सुवर्णा मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा घोगरे यांचीही भाषणे झाली.

सभेअगोदर पदयात्रा काढण्यात आली. बाळासाहेब लामखडे व विकास शेटे यांनी सूत्रसंचालन केले. मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त शंकरराव लामखडे व विश्वास शेटे यांनी आभार मानले.
- 7वा वेतन आयोगासारखं 8व्या आयोगात होणार नाही ! कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणारच नाही ? सरकारच्या भूमिकेने कर्मचारी चिंतेत
- 2026 मध्ये चांदीची किंमत अडीच लाख रुपये प्रति किलो होणार ? तज्ञांचा अंदाज काय सांगतो
- महाराष्ट्रातील ‘हे’ दोन जिल्हे जोडणारा नवीन रेल्वेमार्ग तयार होणार ! नव्या प्रकल्पाचा 30 लाख नागरिकांना होणार फायदा
- पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेपासून एटीएम आणि यूपीआयद्वारे पैसे काढता येणार, मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली अपडेट
- राज्यातील लाडक्या बहिणींसाठी चिंताजनक बातमी ! नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार, कारण काय ?













