अंबाजी : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात सोमवारी एक खासगी प्रवासी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात २१ ठार, तर ५० जण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधानांनी या अपघातावर शोक व्यक्त केला.. बसमधील सर्वजण अंबाजी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. या बसमध्ये सुमारे ७० भाविक होते. दर्शनावरून परतत असताना अंबाजी-दांता मार्गावरील त्रिशुलिया घाटात ही ट्रॅव्हल्स उलटली. हा अपघात एवढा भीषण होता २१ जण जागीच ठार झाले. उर्वरित सर्व ५० जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावांतील गावकरी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने बस सरळ करून त्यामधून अडकलेल्या लोकांना बाहेर काढावे लागले. अपघातस्थळी रक्त, मांसाचा अक्षरश: सडा पडला होता. पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. या अपघाताचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही. पावसामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
- राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
- महाराष्ट्राला सुमारे 500 कोटी रुपयांचा नवा रेल्वे मार्ग मिळणार ! प्रवाशांचा प्रवास होणार सुपरफास्ट
- भारत – पाकिस्तान तणावामुळे काजू, बदामचे भाव वाढलेत ! ड्रायफ्रूटचे रेट किलोमागे ‘इतके’ वाढले, काजू बदामचे सध्याचे रेट कसे आहेत ?
- डॉ. अनिल बोरगे यांनी अपहार उघड झाल्यानंतरही पोलिसात फिर्याद देऊन गुन्हा दाखल का केला नाही ?
- बाळासाहेब थोरातांचे वक्तव्य पराभवाच्या वैफल्यातून, आमदार अमोल खताळ यांची जोरदार टीका