अंबाजी : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात सोमवारी एक खासगी प्रवासी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात २१ ठार, तर ५० जण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधानांनी या अपघातावर शोक व्यक्त केला.. बसमधील सर्वजण अंबाजी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. या बसमध्ये सुमारे ७० भाविक होते. दर्शनावरून परतत असताना अंबाजी-दांता मार्गावरील त्रिशुलिया घाटात ही ट्रॅव्हल्स उलटली. हा अपघात एवढा भीषण होता २१ जण जागीच ठार झाले. उर्वरित सर्व ५० जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावांतील गावकरी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने बस सरळ करून त्यामधून अडकलेल्या लोकांना बाहेर काढावे लागले. अपघातस्थळी रक्त, मांसाचा अक्षरश: सडा पडला होता. पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. या अपघाताचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही. पावसामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 21 व्या हत्याबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, Pm Kisan चे 2000 केव्हा मिळणार?
- …तर ह्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून 30 टक्के रक्कम कपात होणार ! शासनाचा नवा निर्णय काय ?
- मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! २,९०० कोटी रुपयांचा खर्च करून तयार होणार आणखी एक नवीन सहा पदरी एक्सप्रेस वे
- पुढील आठवड्यात ‘या’ 5 कंपन्या देणार Dividend ! गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी
- Post Office च्या RD स्कीममध्ये प्रत्येक महिन्याला 2800 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?













