सोलापूर : राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी झाली आहे. ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी बचे तो पिछे आओ!’ असे म्हणण्याची पाळी या नेतृत्वावर आली आहे. राज्यातील भाजपा-शिवसेना महायुतीने गेल्या पाच वर्षांत विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे विरोधकांना आमच्या विरुद्ध लढण्याची ताकदच राहिली नाही.
राज्यात व देशात पुढील २५ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच राज्य करेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. . नातेपुते येथील पालखी मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या १५ वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीने जेवढे काम केले नाही तेवढे काम आम्ही गेल्या पाच वर्षांत पूर्ण केले आहे.

मराठा, मुस्लिम, लिंगायत, धनगर या समाजांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे. शेती, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य यासाठी विशेष करून काम केले आहे. आता दुष्काळमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन आलो आहे. या सगळ्या योजना पूर्ण करण्याचे काम सुधाकर परिचारक यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रस्ते बनवले. पाच वर्षात गरिबांना घरे बांधून दिली, पाणी मिळवून दिले.
२०२२ पर्यंत महाराष्ट्रातील एकही गरीब घरापासून वंचित राहणार नाही. हे सामान्यांचे, गरिबांचे, शेतकऱ्यांचे सरकार आहे. संत बसवेश्वर, चोखामेळा यांच्या स्मारकाचे काम लवकरच पूर्णत्वाला नेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
- मुंबई – आग्रा महामार्ग प्रकल्पाबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी ! महामार्गाचा ‘हा’ टप्पा सहापदरी होणार, नितीन गडकरींची माहिती
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन अपडेट ! Old Pension Scheme लागू होणार की नाही ? सरकारने अखेर मौन सोडल
- राज्यातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, 3 अपत्य असतानाही मिळणारा ‘हा’ लाभ
- राज्यातील लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी मिळणार मोठी भेट ! नोव्हेंबर , डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर
- सोन्याच्या किमतीत अजूनही तेजीचे संकेत ! दहा ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपये मोजावे लागणार ? काय सांगतात तज्ञ