वैराग (सोलापूर): कोणत्या पक्षावर बोलावे यावर बार्शी तालुक्यात येण्यापूर्वी बाहेरच्या नेत्यांना विचार करावा लागतो. पराभव रणात नाही तर मनात होतो. त्यातूनच त्यांना पराभवाची जाणीव झाल्यामुळे दल बदलूंनी पक्ष बदलला, अशी खरमरीत टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वैराग येथे केली.
राष्ट्रवादीचे बार्शीचे उमेदवार निरंजन प्रकाश भूमकर यांच्या प्रचारार्थ बोलताना ते पुढे म्हणाले, ही निवडणूक दोन विचारांची आहे. तरुणांच्या आणि महाराष्ट्राच्या भवितव्याची आहे. पाच वर्षात सत्तेवर असलेल्या सरकारने आश्वासनांचा पाऊस पाडला.

प्रत्यक्षात कुणाच्याच पदरात काहीच पडले नाही. मात्र आमची सत्ता येताच तिन महिन्यात सात-बारा कोरा, केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण, उच्च शैक्षणिक कर्ज बिनव्याजी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- छोटे शेअरचा मोठा धमाका! 75 वरून थेट 114… गुंतवणूकदारांना दिला दुप्पट परतावा
- स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातीनिहाय जनगणना! काय विचारले जाईल?, कधी होईल जनगणना?, काय होणार याचा परिणाम? सर्वकाही वाचा एका क्लिकवर
- पहिल्याच दिवशी तोटा! जैनिक पॉवरच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांची झोप उडवली… नेमके काय घडले?
- अहिल्यानगर ‘या’ नावामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी, तात्काळ नाव बदलून विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्याची मागणी
- कारच्या मागच्या काचेतले ‘हे’ तंत्रज्ञान बऱ्याच जणांना कळतच नाही, जाणून घ्या डिफॉगरचे खरे काम!