वैराग (सोलापूर): कोणत्या पक्षावर बोलावे यावर बार्शी तालुक्यात येण्यापूर्वी बाहेरच्या नेत्यांना विचार करावा लागतो. पराभव रणात नाही तर मनात होतो. त्यातूनच त्यांना पराभवाची जाणीव झाल्यामुळे दल बदलूंनी पक्ष बदलला, अशी खरमरीत टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वैराग येथे केली.
राष्ट्रवादीचे बार्शीचे उमेदवार निरंजन प्रकाश भूमकर यांच्या प्रचारार्थ बोलताना ते पुढे म्हणाले, ही निवडणूक दोन विचारांची आहे. तरुणांच्या आणि महाराष्ट्राच्या भवितव्याची आहे. पाच वर्षात सत्तेवर असलेल्या सरकारने आश्वासनांचा पाऊस पाडला.

प्रत्यक्षात कुणाच्याच पदरात काहीच पडले नाही. मात्र आमची सत्ता येताच तिन महिन्यात सात-बारा कोरा, केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण, उच्च शैक्षणिक कर्ज बिनव्याजी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक कर्ज
- Post Office मध्ये 5 वर्षांसाठी 15 लाख रुपयांची एफडी केल्यास किती रिटर्न मिळणार? वाचा…
- रेल्वेचा मेगा प्रोजेक्ट ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात विकसित होणार 7 नवीन रेल्वे स्थानक, वाचा सविस्तर
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ विद्यार्थ्यांना दरमहा मिळणार 1000 रुपये
- खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! PF खातेधारकांसाठी सरकारने सुरू केली नवीन सुविधा