कर्जत : आपण गेली पाच वर्षे काम केले म्हणून काही चुका झाल्या असतील ज्यांनी कामेच केली नाहीत. त्यांच्या चुका कोणत्या होणार यांनी कोणती कामे केली तर फक्त काटा मारला, भाडे थकवले व आता कोणते कामे सुरू आहेत. तर चॉकलेट, पॅड, घोंगते वाटप, विधानसभा ही काय लुटुपुटूची लढाई आहे काय, असा प्रश्न उपस्थित करत ना.प्रा.राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवाराचे नाव न घेता टीका केली.
कर्जत तालुक्यातील कुळधरण, बारडगाव परिसरातील ग्रामस्थांशी ना.शिंदे यांनी संवाद साधल. करमनवाडी येथे गणपत सायकर यांनी प्रास्ताविक करताना गेली अनेक वर्षे सत्ता असताना त्यांनी कर्जत जामखेडचा विकास का केला नाही. असा प्रश्न उपस्थित करत फक्त येसवडी चारीचे पाणी करमनवाडी पर्यंत यावे एवढीच अपेक्षा व्यक्त केली. दादा सोनमाळी म्हणाले आपली एक चूक दहा बारा वर्षे मागे नेऊ शकते. जिल्ह्यातील विखेंना बाहेरचा उमेदवार म्हणणारे हे स्वत: दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन कसे लढू शकतात. असा प्रश्न उपस्थित केला. या बाहेरच्या उमेदवाराला आपल्याला बाहेर काढायचे आहे असे म्हटले.

राजेंद्र देशमुख यांनी तुमच्या घरातील भांडणे आमच्या मुळावर का आणता. असे म्हणत जोरदार टीका केली. दादाभाऊ चितळकर यांनी निवडणूक राम शिंदेच्या अस्तित्वाची नाही तर आपल्या अस्तित्वाची आहे. कुकडीच पाणी आत्ताच नीटनेटके का मिळते आहे. घरच्या माणसाकडूनच आपण अपेक्षा करतो. त्यामुळे आपल्या पूर्वीपेक्षा अपेक्षा वाढल्या असून सर्वानी चिंतन केले पाहिजे. शेवटी ना. प्रा. राम शिंदे म्हणाले, आगामी दोन वर्षात साखर कारखानाच काढतो, २०२१ ला त्याचे पाहिले गाळप निघाले पाहिजे असे फास्ट काम करणार आहे. म्हणजे लोकांच्या हक्काचा कारखाना होईल कारण आपल्या तालुक्यात जो लोकांचा कारखाना होता.
तो तर यांनीच कवडीमोल भावाने विकत घेतला. आगामी काळात दिवाळी येणार आहे घरा घरात जे येणार आहे ते नाकारू नका कारण एकदा हे गेले की परत हिकडं फिरकून बघणार नाहीत. माझा माझ्या मतदार संघातील लोकांवर विश्वास आहे.जे कधी मिळत नव्हते ते मिळवून देण्याचा प्रयत्न केला आह. म्हणूनच आपली मंत्रीपदाची सीट राखीव केली गेली आहे. मी तर भाग्यवान आहेच पण आपला मतदारसंघ ही भाग्यवान असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे उमेदवाराचे नाव न घेता जोरदार टीका केली.
- मुकेश अंबानीच्या अँटिलीया बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना मिळतो 2 लाख रुपयांपर्यंत पगार; नोकरी कशी मिळणार ? वाचा सविस्तर
- महाराष्ट्र चीन आणि स्वित्झर्लंडचा रेकॉर्ड मोडणार ; जगातील सर्वाधिक लांब काचेचा पूल महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तयार होणार !
- मुंबई ते हैदराबाद प्रवास होणार वेगवान ! महाराष्ट्रात तयार होणार नवा सुपरफास्ट एक्सप्रेस हायवे
- काय सांगता ! चक्क 500 वर्षानंतर तयार होतोय एक नवीन राजयोग, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
- शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात अचानक आला मोठा ट्विस्ट ! CM देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला महामार्गाचा नवीन अलाइनमेंट













