अहमदनगर :- मनपाचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग रजेवर गेल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे गुरूवारी पुन्हा एकदा महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाचा भार सोपवण्यात आला. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या बदलीनंतर मोठ्या कालावधीसाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी मनपाचा कारभार पाहिला होता. त्यानंतरही वेळोवेळी त्यांच्याकडे मनपाची धुरा सोपवण्यात आली. मोठ्या प्रतीक्षेनंतर आयुक्त भालसिंग यांची नियुक्ती झाली.
भालसिंग रजेवर असल्याने ५ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे पुन्हा आयुक्तपदाचा भार सोपवण्यात आला आहे. नगर शहरातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला असून अधिकाऱ्यांसह व पदाधिकारीही निमूटपणे खड्डे असलेल्या रस्त्यांवरून प्रवास करतात. रस्ते दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांना खड्ड्यांना सामोरे जावे लागते.

विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत मनपा कर्मचारी व अधिकारी निवडणुकांच्या कामात व्यग्र होते. आचारसंहिता असल्याने धोरणात्मक निर्णय घेतले गेले नाहीत, तसेच कामांचे कार्यारंभ आदेशही दिले गेले नाहीत.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













