जामखेड :- चार वर्षांपूर्वी उसने दिलेले एक लाख रुपये मागितल्याच्या कारणावरून खर्डा येथे बाळु बजरंग पवार या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या प्रकरणी एकूण पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थ व नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी समजूत घातल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन बंद मागे घेण्यात आला.याबाबत बाळु पवार याची मावशी वेणुबाई बाजीराव काळे यांनी जामखेड पोलिसात फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बिभीषण वाळस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, व राहुल गौतम तादगे (सर्व रा. खर्डा) या पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













