राहाता :- तालुक्यातील गोगलगांव येथील तरुण शेतक-याने सततची नापिकीमुळे आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळून गुरूवारी (दि.३१) मध्यरात्री घरातच गळफास घेत जीवनयात्रा संपविली. रवींद्र लक्ष्मण मगर (वय ३०) असे या शेतक-याचे नाव असून तो अविवाहित होता. वडिलाच्या निधनानंतर तो आपल्या वृध्द आईसोबत राहत होता.
रवींद्रला गोगलगांव येथे अवघी तीन एकर शेतजमीन आहे. वेळेत पाऊस झाला नाही म्हणून या शेत जमिनीत पेरलेले व्यवस्थित उगवले नाही. जे उगवले ते सध्याच्या अतिवृष्टीमुळे पदरी पडले नाही. यामुळे रवींद्र हा वैफल्यग्रस्त होता.

त्यातच दिवाळी सणाकरीता कुटूंबासाठी आणि बहीण, भाच्यांना काहीच घेण्याची ऐपत नसल्याने तो ताणतणावात होता. यातूनच गुरूवारी मध्यरात्री वृध्द आई घरात झोपल्यानंतर रवींद्र्रने घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेवून जीवनयात्रा संपविली.
- भारत – पाकिस्तान तणावामुळे काजू, बदामचे भाव वाढलेत ! ड्रायफ्रूटचे रेट किलोमागे ‘इतके’ वाढले, काजू बदामचे सध्याचे रेट कसे आहेत ?
- डॉ. अनिल बोरगे यांनी अपहार उघड झाल्यानंतरही पोलिसात फिर्याद देऊन गुन्हा दाखल का केला नाही ?
- बाळासाहेब थोरातांचे वक्तव्य पराभवाच्या वैफल्यातून, आमदार अमोल खताळ यांची जोरदार टीका
- अहिल्यानगरमध्ये रानडुक्कर आणि सश्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ; बिबटे, तरस आणि कोल्ह्यांचा मुक्त संचार
- SBI ची FD योजना बनवणार मालामाल ! 12 महिन्यांच्या एफडी योजनेत 1 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?