कोपरगाव : विधानसभा मतदारसंघात परतीच्या पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पंचनामे सुरू आहेत; मात्र सरसकट पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळवून द्या, असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांना घातले आहे.
पवार यांना दिलेल्या निवेदनात आ. काळे यांनी म्हटले आहे, की सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, कांदा रोप आदी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शासनाकडून मदत मिळेल या आशेवर शेतकरी बसलेला आहे.

नुकसानीचे सरसकट पंचनामे करून या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ढिगारे लावलेल्या पिकांची मळणी वेळेवर न झाल्यामुळे या पिकांना मोड फुटले असून शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असतानादेखील पिकांचे पंचनामे होत नाहीत. त्यामुळे आपण नुकसान भरपाईपासून वंचित राहणार या भीतीपोटी शेतकरी हवालदिल झाला आहे.
पीक विमाधारक शेतकऱ्यांना कागदपत्राच्या जाळ्यात न अडकविता महसूल मंडलामार्फत केलेला पंचनामा ग्राह्य धरून मदत देण्यात यावी. रब्बी हंगामाची पिके उभी करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट पंचनामे व्हावेत, व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरघोस नुकसान भरपाई मिळवून द्यावी, असे काळे यांनी म्हटले आहे.
- दक्षिण मुंबईत पार्किंगसाठी उपाययोजना उच्च न्यायालय परिसरात रोबोटिक भूमिगत पार्किंग सुरू होणार
- सायन-पनवेल महामार्गावरही ब्लॉक ७ मार्चच्या रात्रीपासून सात तासांसाठी वाहतूक बंद
- जेवणासाठीच नव्हे, तर कांद्याचे इतर ५ फायदेही जाणून घ्या
- 2025 मध्ये सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या बाइक्स! कमी किंमत, जबरदस्त मायलेज
- पेट्रोल आणि डिझेल कार ओळखायची आहे? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरा!