कोपरगाव : विधानसभा मतदारसंघात परतीच्या पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पंचनामे सुरू आहेत; मात्र सरसकट पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळवून द्या, असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांना घातले आहे.
पवार यांना दिलेल्या निवेदनात आ. काळे यांनी म्हटले आहे, की सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, कांदा रोप आदी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शासनाकडून मदत मिळेल या आशेवर शेतकरी बसलेला आहे.

नुकसानीचे सरसकट पंचनामे करून या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ढिगारे लावलेल्या पिकांची मळणी वेळेवर न झाल्यामुळे या पिकांना मोड फुटले असून शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असतानादेखील पिकांचे पंचनामे होत नाहीत. त्यामुळे आपण नुकसान भरपाईपासून वंचित राहणार या भीतीपोटी शेतकरी हवालदिल झाला आहे.
पीक विमाधारक शेतकऱ्यांना कागदपत्राच्या जाळ्यात न अडकविता महसूल मंडलामार्फत केलेला पंचनामा ग्राह्य धरून मदत देण्यात यावी. रब्बी हंगामाची पिके उभी करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट पंचनामे व्हावेत, व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरघोस नुकसान भरपाई मिळवून द्यावी, असे काळे यांनी म्हटले आहे.
- महाराष्ट्र राज्य शासनाचा डोळे दिपवणारा मेगाप्रोजेक्ट ! राज्यात तयार होणार नवा सहापदरी मार्ग, 5 तासांचा प्रवास फक्त दीड तासात
- नवीन वर्षाआधीच महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मिळाली मोठी भेट ! ‘या’ शहरातील दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके प्रवाशांच्या सेवेत दाखल
- आठव्या वेतन आयोगात पेन्शन धारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार नाही का? सरकारने स्पष्टचं सांगितलं
- फडणवीस सरकारचा लाडकी बहिण योजनेबाबत आणखी एक मास्टरस्ट्रोक ! महायुती सरकारचा नवा निर्णय पहा…
- मोठी बातमी ! पुण्यातील ‘हा’ भाग सुद्धा आता मेट्रोच्या नकाशावर येणार, CM फडणवीसांची मोठी घोषणा













