श्रीगोंदा : बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे हे दोन्ही तालुक्यातील नेते एकत्र आल्याने गटातटाचे राजकारण संपुष्टात आले आहे. आता खरे तालुक्याचे विकासपर्व सुरु होणार आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्याच्या पाणी प्रश्नात नागवडे -पाचपुते एकत्र आल्यामुळे घोड कुकडीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. असे मत नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे यांनी व्यक्त केले.
बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ शहरातून फेरी काढली होती. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी व तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी पाचपुते यांच्या पाठीशी उभे रहा. श्रीगोंदा शहराचा सर्वांगिण विकास व शहरातील विविध विकासकामासाठी पाचपुते आमदार नसतानाही कोट्यवधी रुपयांचा निधी आणला .

मागील काही गैरसमजुतीतून पाचपुते यांच्यापासून दूर राहावे लागले.पण आता पुन्हा शहराच्या विकासाच्या मुद्यावर आम्ही राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली पाचपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













