पारनेर : राज़्यातील भाज़पा- शिवसेना युतीचे सरकार शेतकरीविरोधी असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकते, असे प्रतिपादन पारनेर- नगर तालुका मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांनी केले.
नगर तालुक्यातील अरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला, या वेळी लंके बोलत होते. या वेळी लंके म्हणाले, पारनेरसह नगर तालुक्यातील सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी असून, दोन्ही तालुक्यांतून आपल्याला मोठे मताधिक्य मिळेल.

उद्याच्या काळात पक्षातील सर्व ज्येष्ठांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तालुक्यात येणाऱ्या विधानसभेत नक्कीच परिवर्तन होईल. आपण मतदार संघाच्या विकासाला प्राधान्य देणार असून, विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असेल, असे शेवटी लंके म्हणाले.
- चेहऱ्यावरील डाग, काळवटपणा दूर करण्यासाठी रोज लावा ‘हा’ नैसर्गिक फेसपॅक! घरच्या घरी फेसपॅक बनवण्याची पद्धत जाणून घ्या
- डायलिसिस, कर्करोग तसेच ‘या’ मोठ्या आजारांवर होईल मोफत उपचार! सरकारी योजनेसाठी आजच नोंदणी करा, पाहा संपूर्ण प्रोसेस
- 3 तासांचं अंतर अवघ्या 20 मिनिटांत! तब्बल 5,500 कोटी खर्चून भारत बनवतोय आशियातील सर्वात लांब बोगदा; पाहा वैशिष्ट्ये
- डेंग्यू-मलेरियाचा धोका टाळा! घराच्या बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये लावा ‘ही’ रोपं, डास घराकडे फिरकणारही नाहीत
- Ahilyanagar News : माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या वाहनाला भीषण अपघात