पारनेर : राज़्यातील भाज़पा- शिवसेना युतीचे सरकार शेतकरीविरोधी असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकते, असे प्रतिपादन पारनेर- नगर तालुका मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांनी केले.
नगर तालुक्यातील अरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला, या वेळी लंके बोलत होते. या वेळी लंके म्हणाले, पारनेरसह नगर तालुक्यातील सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी असून, दोन्ही तालुक्यांतून आपल्याला मोठे मताधिक्य मिळेल.

उद्याच्या काळात पक्षातील सर्व ज्येष्ठांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तालुक्यात येणाऱ्या विधानसभेत नक्कीच परिवर्तन होईल. आपण मतदार संघाच्या विकासाला प्राधान्य देणार असून, विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असेल, असे शेवटी लंके म्हणाले.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













