पारनेर : राज़्यातील भाज़पा- शिवसेना युतीचे सरकार शेतकरीविरोधी असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकते, असे प्रतिपादन पारनेर- नगर तालुका मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांनी केले.
नगर तालुक्यातील अरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला, या वेळी लंके बोलत होते. या वेळी लंके म्हणाले, पारनेरसह नगर तालुक्यातील सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी असून, दोन्ही तालुक्यांतून आपल्याला मोठे मताधिक्य मिळेल.

उद्याच्या काळात पक्षातील सर्व ज्येष्ठांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तालुक्यात येणाऱ्या विधानसभेत नक्कीच परिवर्तन होईल. आपण मतदार संघाच्या विकासाला प्राधान्य देणार असून, विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असेल, असे शेवटी लंके म्हणाले.
- भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ‘या’ मार्गावर धावणार ! कसा असणार 89 किलोमीटरचा रूट ? तिकीट फक्त 5 रुपयांपासून सुरु
- 8व्या वेतन आयोगा आधीच सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार ! 2026 मध्ये पगारात किती वाढ होणार ?
- एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ नियमात पुन्हा एकदा मोठा बदल, बँकेत जाण्याआधी नक्कीच वाचा
- शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! सुप्रीम कोर्टाच्या TET सक्तीच्या आदेशानंतर केंद्र सरकारने घेतला ‘हा’ निर्णय, शिक्षकांना दिलासा….
- अहिल्यानगरात विकासाचा नवा निर्धार ! भाजपा राष्ट्रवादी युतीच्या प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद; शहर दुमदुमले













