पुणे विभागातून ४५ हजार ३०२ प्रवाशांना घेऊन ३६ विशेष रेल्वेगाड्या रवाना

Published on -

पुणे – लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार राज्यामधील ४५  हजार ३०२ मजूरांना घेऊन पुणे विभागातून ३६ विशेष रेल्वेगाड्या रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी १४, उत्तरप्रदेशसाठी १४, उत्तराखंडसाठी १, तामिळनाडूसाठी १, राजस्थानसाठी ३ व बिहारसाठी ३ अशा एकूण ३६ रेल्वेगाडया ४५ हजार ३०२ प्रवाशांना घेऊन रवाना झाल्या आहेत.

दि. १६ मे रोजी पुणे विभागातून उत्तरप्रदेशसाठी २, राजस्थान व बिहारसाठी प्रत्येकी १ अशा एकूण ४ रेल्वेगाड्या नियोजित असून यामध्ये एकूण  ५६५० प्रवासी अपेक्षित आहेत.

यापैकी पुणे स्थानकावरून उत्तरप्रदेश, राजस्थान व बिहारसाठी प्रत्येकी एक रेल्वे १४०० प्रवाशांसह नियोजित आहे. तर सातारा रेल्वे स्थानकावरुन उत्तर प्रदेशसाठी १४५० प्रवाशांसह एक रेल्वेगाडी नियोजित आहे.

या नागरीकांच्या प्रवासाच्या नियोजनाकरिता  संबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावत असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!