इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञा पत्रात माहिती लपवणाऱ्यांची चौकशी होत नाही. मात्र ज्या संस्थेचा संचालक वा सभासदही नाही अशा प्रकरणात माझे नाव गोवले जाते. काय चौकशी करायची ती करा, ‘लय बघितल्यात’ काळजी करायचे कारण नाही, असा इशारा महायुतीच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिला. भाजपाचे सरकार दडपशाहीचे राजकारण करत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
ते इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या पहिल्याच जाहीर सभेत बोलत होते.. शरद पवार म्हणाले, सरकारला शेतक ऱ्यांची किंमत नाही. तरूणांची बेरोजगारांची संख्या, महागाई वाढतच चालली आहे. सरकार चालवताना शेतकरी हिताची काळजी घ्यावी लागते. युवकांच्या हातांना काम देण्यासाठी धोरण आखले पाहिजे.

या पातळीवर या सरकारची कामगिरी पाहता सर्वत्र नैराश्य पहायला मिळते. ते म्हणाले, शिखर बँक प्रकरणी इतर पक्षातील संचालक असताना अजित पवार यांचेच नाव घेतले जाते. इतरांचे नाव घेतले जात नाही. बारामतीतील साखर कारखान्याचा सभासद असताना माझे नाव ही घेतले गेले. हा सारा प्रकार दडपशाही राजकारणाचा आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना किंमती ठरवण्याचा अधिकार नाही. सुमारे सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु वाळवा तालुक्यात एकही आत्महत्या झाली नाही हे खऱ्या अर्थाने विकासाचे द्योतक आहे. जयंतरावांच्या या प्रचाराच्या शुभारंभाचा विजयी संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवणार आहे.
- पुणे, अहिल्यानगर, नागपूरकरांसाठी Good News! रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनासाठी चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ स्थानकावर थांबा
- भारतीय सैन्यातील अग्नीवीरांना किती पगार मिळतो ? पहिल्या वर्षापासून ते चौथ्या वर्षापर्यंतच्या पगाराचे स्ट्रक्चर पहा
- मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गोड बातमी ! वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस मध्ये मिळणार….
- IBPS Clerk Jobs 2025: IBPS अंतर्गत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती! 10,277 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा
- एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…