शिर्डी :- खा. डॉ. सुजय विखे व ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करून अवघे काही महिने झाले आहेत. असे असले तरी विकासाची कामे उभी करून त्यांनी जनहितासाठी नेहमीच योगदान दिले आहे. शासकीय योजना राबविण्यास नेहमीच प्राधान्य दिले.
असे असताना माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाला विखे कारणीभूत आहेत, असा आरोप काही कार्यकर्ते करीत असून वास्तविक पराभवातून त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे मत राहाता पंचायत समितीच्या सभापती हिराबाई कातोरे, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, संचालक शरद मते, पंचायत समितीचे सदस्य ओमेश जपे यांनी व्यक्त केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, विखे यांनी अवघ्या तीन दिवसात शिवसेनेचे खा. सदाशिवराव लोखंडे यांच्याबद्दल लोकसभा मतदारसंघात मोठी नाराजी असतानाही मताधिक्य मिळवून देत विजयी केले. त्या विजयाचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे आले.
मग असे असताना विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव का झाला, यांचे आत्मचिंतन त्यांनीच करण्याची गरज आहे. कोल्हे यांच्या पराभवाला कोपरगाव तालुक्यात व शहरात असलेले खराब रस्ते, १५ दिवसांनी मिळणारे पाणी, बेरोजगारी, शासकीय योजना राबविण्यात असलेली उदासिनता, पाच नंबर तलावाला लागलेले राजकीय साठमारीचे ग्रहण अशी अनेक कारणे असतानाही त्यांना अकरा गावात चांगले मतदान झाले आहे. याचा त्यांच्या कार्यकर्त्यांना विसर पडला आहे.
ना. राधाकृ ष्ण विखे पाटील यांच्यावर निराधार करत असलेले आरोप राहाता तालुक्यातील जनता कदापिही सहन करणार नाही. आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी पराभवाचे खापर दुसऱ्या कोणावरही टाकून आत्मचिंतन न करता कार्यकर्ते समाधान मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतील तर हा प्रकार चुकीचा आहे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
- दिवाळीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन आहे? ‘या’ 5 शेअर्स मध्ये गुंतवणूक करा, 25 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळणार
- महाराष्ट्रातील जनतेसाठी केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ 2 Railway मार्गांना मिळाली मंजुरी, कसे असणार रूट?
- ई – केवायसी केली नसेल तर लाडक्या बहिणींना सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही का ? समोर आली महत्वाची अपडेट
- Share Market गुंतवणूकदारांची चांदी होणार ! एका शेअरवर थेट 40 रुपयांचा डिव्हीडंड देणार ‘ही’ कंपनी
- शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांना हे 3 स्टॉक बनवणार मालामाल ! मिळणार 53 टक्क्यांपर्यंत रिटर्न