नेवासा :- तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे आठ दिवसात सरसकट पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, नेवाशाचे तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांनाही तशा सूचना दिल्या असल्याची माहिती आमदार शंकरराव गडाख यांनी दिली.
गुरुवारी सायंकाळी आदित्य ठाकरे यांच्यासमवेत शिवसेना आमदारांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले. त्यात सेनेला पाठिंबा दिलेले आमदारही होते. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून,

त्यात खरिपाच्या पिकांसह इतर बारमाही पिके व फळबागांचेही नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. म्हणून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट सर्व प्रकारची मदत करण्यासाठी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, अशी विनंती सेना आमदारांनी राज्यपालांना केली होती.
नवीन शासन सत्तेवर येण्यास काही अवधी लागणार असल्याने आपल्या स्तरावर त्वरित निर्णय घ्यावेत, अशी विनंती राज्यपालांना केली होती. मुख्य सचिवांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासनही राज्यपालांनी दिले होते. अपेक्षेप्रमाणे मुख्य सचिवांशी चर्चा झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे त्वरित सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे आ. गडाख यांनी म्हटले आहे.
- Stock To Buy: लॉजिस्टिक क्षेत्रातील ‘हा’ शेअर्स मिळवून देऊ शकतो पैसा! नोट करा ब्रोकरेजने दिलेली रेटिंग आणि टार्गेट प्राईस
- Bonus Shares: ‘या’ 2 कंपन्या या आठवड्यात देणार बोनस शेअर्स! पटकन नोट करा रेकॉर्ड डेट
- Stock Split: अदानी ग्रुपची ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना दिवाळीपूर्वी देणार गिफ्ट! 5 वर्षात दिलेत 1505% रिटर्न…बघा अपडेट
- Share Market: ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांच्या पैशांची केली माती! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तर नाहीत ना? बघा यादी
- Smallcap Stocks: लॉन्ग टर्म गुंतवणुकीची मोठी संधी! ‘हे’ स्मॉल कॅप्स शेअर्स देतील 40% पर्यंत रिटर्न? बघा लिस्ट