अहमदनगर : शहरातील घासगल्ली भागात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वा.सुमारास घडली. याबाबत कोतवाली पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याचे पो. कॉ. शहीद सलीम शेख गस्तीवर असताना त्यांना अनस मोहम्मद लुकमान खत्री (वय १९), मोहम्मद अबीद हारून खत्री (वय २१, दोघे रा. गोविंदपुरा), आकाश अरुण पंचमुख (वय २१), सुरज रमेश पंचमुख (वय १९, दोघे रा. साईराम सोसायटी, कल्याण रोड) व प्रशांत बलभीम गावडे (वय १९, रा. भावनाऋषी सोसायटी) हे आपसात हाणामारी करताना आढळून आले.
पो.कॉ.शहीद शेख यांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













