श्रीरामपुर: तालुक्यातील कमालपूर येथे दीपावली पाडव्याच्या दिवशी सायंकाळी माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी ग्रामस्थ व युवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युवकांना बहुमोल मार्गदर्शन केले. तर पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धिर दिला.
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर आलेल्या दिवाळी सणावर अवकाळी पावसाचे सावट होते. शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने कमालपूर मधील शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. सोयबीन, कापूस, बाजरी, मका यांसह अनेक पिके हातातोंडाशी आलेली असतानाच अवकाळी पावसामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले.

या व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुरकुटे यांनी गावातील युवक तसेच शेतकरी वर्गाशी संवाद साधला. नोकरी व व्यावसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असणारे अनेकजण दिवाळीनिमीत्त गावी आलेले होते. त्यांच्याशीही विविध विषयांवर मुरकुटे यांनी चर्चा केली.
- अहिल्यानगर ब्रेकिंग : पिसाळलेल्या कोल्ह्याने केला नागरिकांवर हल्ला, कोल्ह्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी
- कृषी विभागाच्या योजना तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, ठिबक, कांदाचाळीचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा- खासदार निलेश लंके
- कंत्राटी कामगारांनी खासदार लंके आणि वाकचौरे यांना विविध मागण्यांचे निवदेन देत मांडल्या व्यथा, सहकार्य करण्याचे आश्वासन
- Shirdi Railway Project : शिर्डीच्या लाखो भक्तांसाठी आनंदाची बातमी ! 239 कोटींचा रेल्वे प्रकल्प मंजूर
- सरकारने हल्ले करण्यासाठी कितीही गुंड सोडले तरी आम्ही पुरोगामी विचार सोडणार नाही- माजी आमदार प्राजक्त तनपुरे