पाथर्डी : मिरी -तिसगाव पाणी योजनेच्या कामात सुसुत्रता यावी, यासाठी अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी यांनी एकत्रीत येवुन काम करण्याची गरज आहे. आता राजकारणाचा भाग सोडा आणि पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नावर एकत्रीत या. अवैध पाणी घेणाऱ्यांना समज देवु आणि तरीही कुणी जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम केले तर मग कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. असा इशारा आमदार प्रसाद तनपुरे यांनी दिला आहे.
येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्या दालनात झालेल्या मिरी-तिसगाव योजनेच्या बैठकीत तनपुरे बोलत होते. शिवसेनचे जिल्हा परीषद सदस्य अनिल कराळे, रफिक शेख, अमोल वाघ, राजेंद्र म्हस्के, बाळासाहेब जाधव , गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी उपस्थीत होते.

यावेळी तनपुरे म्हणाले, मिरी -तिसगाव पिण्याची पाणी योजना व वांबोरी पाईपलाईन चारी योजना या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या योजना आहेत. जनभावना महत्वाच्या असतात त्या जपल्या पाहीजेत. योजनेचे थकीत बिले, दुरुस्ती आणि नव्याने काय करता येईल यांच्यासाठी लवकरच योजनेच्या लाभक्षेत्रातील सरपंच व ग्रामसेवक, पंचायत समितीचे सदस्य व जि.प.सदस्य अशी बैठक बोलावुन त्यामधे चर्चा करण्यात येईल.
योजनेच्या पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा हा उद्देश आहे. योजनेला जिल्हा परीषदेने दिलेला निधीचा खर्च योग्य रितीने व्हावा. आणि आणखी निधी देण्याचे काम करु माझे या योजनेच्या कामाला प्राधान्य राहील.
- मुकेश अंबानीच्या अँटिलीया बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना मिळतो 2 लाख रुपयांपर्यंत पगार; नोकरी कशी मिळणार ? वाचा सविस्तर
- महाराष्ट्र चीन आणि स्वित्झर्लंडचा रेकॉर्ड मोडणार ; जगातील सर्वाधिक लांब काचेचा पूल महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तयार होणार !
- मुंबई ते हैदराबाद प्रवास होणार वेगवान ! महाराष्ट्रात तयार होणार नवा सुपरफास्ट एक्सप्रेस हायवे
- काय सांगता ! चक्क 500 वर्षानंतर तयार होतोय एक नवीन राजयोग, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
- शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात अचानक आला मोठा ट्विस्ट ! CM देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला महामार्गाचा नवीन अलाइनमेंट













