अहमदनगर :- मागील पाच वर्षाचे विकासात्मक कार्य पाहून जनतेने संग्राम जगताप यांच्याबाजूने कौल दिला आहे. विकास विरुध्द निष्क्रीय माजी आमदारामध्ये ही लढत होती. यामध्ये विकासात्मक नेतृत्वाचा विजय झाला असल्याची भावना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी व्यक्त केली.
अहमदनगर शहर विधानसभा निवडणुकितील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप दुसर्यांदा विधानसभेच्या सदस्यपदी निवडून आल्याबद्दल व या विजयाचे शिल्पकार ठरलेले आमदार अरुण जगताप यांचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी ओबीसी सेलचे अमित खामकर, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, सुमतीलाल कोठारी, उध्दव शिंदे, अन्वर शेख, फईम जहागीरदार, गणेश वामन, अतुल पुरुषोत्तम आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे प्रा.विधाते म्हणाले की, संग्राम जगताप यांच्या विजयासाठी सर्व समाजातील जनतेने मतदान केले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनाचे हे यश आहे.
तर आमदार संग्राम जगताप यांनी शहराचा विकासात्मक आराखडा तयार केलेला असून, विकासासाठी जनतेने त्यांना निवडून दिले आहे. विरोधकांचा मुद्दा नागरिकांनी खोडून टाकला आहे. पुढील पाच वर्षात झपाट्याने विकासात्मक कार्य होणार असून, नगरकरांच्या अपेक्षा ते पुर्ण करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- Ahilyanagar News : अहिल्यानगरसह अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या ‘या’ मंदिराची वक्फ बोर्डाकडे नोंद
- BIS Bharti 2025: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत 160 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- Union Bank Of India मध्ये 399 दिवसाच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग ‘या’ टिप्स लक्षात ठेवा, लाखो रुपयांचा खर्च वाचणार, पहा…
- घरात साप शिरला तर घाबरू नका, फक्त ‘हे’ उपाय करून पहा, साप असा पळणार की परत मागे फिरणार पण नाही