अहमदनगर :- ‘राज्यात कांद्याचे दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार नगर जिल्ह्यासाठी ७३ कोटी २१ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच प्रसन्ना कृषी मार्केट या खासगी बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे’, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.

जिल्ह्यात कांदा अनुदान वितरित केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमधील ९२ हजार ५८७ पात्र लाभार्थींनी बाजार समितीत संपर्क साधावा. बाजार समिती कार्यालयात आवश्यक कागदपत्रे द्यावीत.
अनुदान वितरण बँकेमार्फत केले जात असून या बँकेचे प्रतिनिधी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. अनुदानाबाबत काही अडचणी असल्यास या प्रतिनिधींच्या टीमशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती व खासगी बाजार समित्यांमध्ये १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत कांदाविक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील हे अनुदान आहे. यामध्ये राज्यातील ३ लाख ९३ हजार ३१७ लाभार्थींना ३८७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
- रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! आता प्रत्येक ५ वर्षांनी ‘ही’ प्रक्रिया पूर्ण करावी लागणार, नाहीतर….
- ब्रेकिंग : केवायसी केली तरी सुद्धा ‘या’ महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ मिळणार नाही, लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ! ‘हे’ शेतकरी राहणार कर्जमाफी पासून वंचित
- आता ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स होणार रिन्यू
- फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी मोठा निर्णय ! Home Loan आणखी स्वस्त होणार













