अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या माळीवाडा येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
या वेळी आमदार जगताप यांच्यासह गिरवले कुटुंबीयही भावनाविवश झाले होते. नगर शहराच्या राजकारणात गिरवले यांनी नेहमीच जगताप कुटुंबीयांना साथ दिली. राजकारणासह कौटुंबिक सुख-दुःखातही त्यांची साथ कायम असायची.

केडगाव हत्याकांडात जगताप यांच्यावर आरोप झाल्यानंतर कैलास गिरवले यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली होती. तेथे झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.
पोलिस कोठडीत असतानाच गिरवले यांचा मृत्यू झाला होता. शेवटपर्यंत साथ देणाऱ्या गिरवलेंबाबत जगताप कुटुंबीयांमध्ये आजही आस्था व आपुलकीचे नाते कायम आहे. त्यामुळेच जगताप यांनी निकालानंतर गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.
- ब्रेकिंग : ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढला, वाचा सविस्तर
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ 5 आजाराच्या उपचारासाठी मिळणार दीड लाख रुपयांची मदत
- पुढील आठवड्यात शेअर मार्केट मधील ‘या’ 5 कंपन्या बोनस शेअर्स आणि लाभांश वितरित करणार !
- लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ; निवडणुक आयोगाकडे काँग्रेसच्या तक्रारीनंतरही मकर संक्रांतीला पैसे मिळणार, CM फडणवीस म्हणतात….
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘या’ 2 भत्त्यात झाली मोठी वाढ!













