अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या माळीवाडा येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
या वेळी आमदार जगताप यांच्यासह गिरवले कुटुंबीयही भावनाविवश झाले होते. नगर शहराच्या राजकारणात गिरवले यांनी नेहमीच जगताप कुटुंबीयांना साथ दिली. राजकारणासह कौटुंबिक सुख-दुःखातही त्यांची साथ कायम असायची.

केडगाव हत्याकांडात जगताप यांच्यावर आरोप झाल्यानंतर कैलास गिरवले यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली होती. तेथे झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.
पोलिस कोठडीत असतानाच गिरवले यांचा मृत्यू झाला होता. शेवटपर्यंत साथ देणाऱ्या गिरवलेंबाबत जगताप कुटुंबीयांमध्ये आजही आस्था व आपुलकीचे नाते कायम आहे. त्यामुळेच जगताप यांनी निकालानंतर गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.
- Jio Prepaid Users साठी खास बातमी! स्वस्त 11 रुपयांपासून 359 रुपयांपर्यंतचे डेटा व्हाउचर्स, फायदे जाणून घ्या
- केंद्रीय संस्कृत विद्यापीठात ४३ शिक्षकेतर पदांची भरती; पगार १.८२ लाखांपर्यंत
- अर्थसंकल्पाच्या दिवशीच सर्वसामान्यांना महागाईचा धक्का; एलपीजी गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग
- सुपरहिट सुरुवात! महिन्याचा पहिलाच दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार खास; आयुष्याला नवी दिशा मिळणार
- 200MP कॅमेरा + 7600mAh बॅटरी! iQOO 15R चार वर्षे अगदी नवा राहणारा फोन !













