अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या माळीवाडा येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
या वेळी आमदार जगताप यांच्यासह गिरवले कुटुंबीयही भावनाविवश झाले होते. नगर शहराच्या राजकारणात गिरवले यांनी नेहमीच जगताप कुटुंबीयांना साथ दिली. राजकारणासह कौटुंबिक सुख-दुःखातही त्यांची साथ कायम असायची.

केडगाव हत्याकांडात जगताप यांच्यावर आरोप झाल्यानंतर कैलास गिरवले यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली होती. तेथे झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.
पोलिस कोठडीत असतानाच गिरवले यांचा मृत्यू झाला होता. शेवटपर्यंत साथ देणाऱ्या गिरवलेंबाबत जगताप कुटुंबीयांमध्ये आजही आस्था व आपुलकीचे नाते कायम आहे. त्यामुळेच जगताप यांनी निकालानंतर गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.
- एसबीआयची 24 महिन्यांची FD योजना गुंतवणूकदारांमध्ये बनली लोकप्रिय ! 4 लाखाची गुंतवणुक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- मुंबईकरांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी, मार्चअखेरीस ‘हा’ Metro मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार, तिकीट दर कसे असणार ? पहा….
- राजकीय आणि प्रशासकीय समीकरणे बदलणार ? अहिल्यानगरच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांबाबत उत्सुकता
- महाराष्ट्रातील नाशिक-अहिल्यानगर-पुणे जिल्ह्यांना जोडणारा ‘हा’ Railway मार्ग प्रकल्प पुन्हा चर्चेत ! मुंबईत मोठी बैठक, रूट पुन्हा बदलणार का ?
- ‘हे’ आहेत भारतातील टॉप 9 श्रीमंत शेतकरी, यादीतील सर्व शेतकरी आहेत कोट्याधीश !