अहमदनगर :- माजी उपमुख्यमंत्री व शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी विधानसभा सदस्यत्वाच्या दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर राजकारणात खळबऴ माजली आहे.
अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर अजित पवार यांचा मोबाईलही बंद आहे.

दरम्यान अजित पवार नगरमधील कर्जत तालुक्यातील त्यांच्या अंबालीका साखर कारखान्यावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ते नेमके तेथे कोणत्या कारणासाठी गेले याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (29 सप्टेंबर) रात्री उशिराने अजित पवार नगरमधील अंबालिका कारखान्यावर दाखल झाले. त्यांच्या कारखान्यावरील मुक्कामाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
अजित पवार यांच्यासोबत कारखान्यात वीरधवल जगदाळे असल्याची माहिती मिळत आहे. जगदाळे हे पवार यांचे भागीदार आहेत.
दरम्यान अजित पवार राजकारणातून संन्यास घेणार का हा प्रश्नही चवीने चघळला जात आहे. याला कारणही तसेच आहे. पवारांनी पत्रकार परिषदेत केलेल्या एका विधानाने या चर्चांना बळ मिळत आहे.
चिरंजीवाने राजकारणात येवू नये. आपण शेती किंवा एखादा व्यवसाय करावा असा सल्ला अजित पवार यांनी पार्थ पवारांना दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
वारांच्या या विधानाने अजित पवार हे राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार तर करत नाहीये ना, या राजकीय चर्चा जोर धरत आहे.
- अनुसूचित जाती, नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टरवर ९०% अनुदान; फक्त ३५ हजारांत मिळणार ट्रॅक्टर
- मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दुहेरी कोंडी; सीटीईटी परीक्षा की निवडणूक कर्तव्य?
- प्रायव्हेट जेट बुक करणं सामान्य माणसालाही शक्य? जाणून घ्या खर्च, प्रक्रिया आणि वास्तव
- आयुष्मान भारत योजना : ७० वर्षांवरील नागरिकांना कसा मिळतो १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ?
- वारकऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूर नियमित रेल्वेची जोरदार मागणी; कायमस्वरूपी एक्स्प्रेस कधी सुरू होणार?













