संगमनेर :- प्रतिनिधी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, आमदार डॉ. सुधीर तांबे, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड आदी मान्यवर उपस्थित होते.

युतीमध्ये ताळमेळ नसून संशयास्पद वातावरण असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पाच वर्षे सत्तेत असूनही शिवसेनेला पीक विम्यासाठी आंदोलन करावं लागलं. शिवसेना-भाजप एकत्र लढले तरी त्यांच्यात आलबेल नसल्याचं स्पष्टपणे दिसत असल्याचा टोला थोरातांनी लगवला.
सोमवारी आपल्या निवासस्थानाहून प्रांतकार्यालयात पायी जात बाळासाहेब थोरातांनी अर्ज दाखल केला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाळासाहेब थोरात यांनी शक्ती प्रदर्शन केलं.
जनतेच्या आशीर्वादाने आपला विजय निश्चित असल्याचं थोरात यांनी सांगितलं. तर आघाडीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात येणार असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
- अकोले तालुक्यात कावीळचा उद्रेक! दूषित पाण्यामुळे रूग्णांची संख्या गेली १३३ वर, आणखी ३७ गावे धोक्यात
- श्रीगोंदा तालुक्यातील सिमेंट कारखान्याला शेतकऱ्यांचा विरोध, आमदार विक्रम पाचपुते यांची भूमिका संशयास्पद ?
- आठव्या वेतन आयोगाबाबत आताची सर्वात मोठी अपडेट ! आयोगाच्या अध्यक्षांचे नाव झाले फायनल, पॅनलची स्थापना कधी ?
- दहावी आणि बारावीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर ! 12 वी चा निकाल 13 मे रोजी आणि 10वी चा निकाल ‘या’ दिवशी लागणार
- पालकांनो! मुलांचे आधार वेळेवर अपडेट केलेत का? नाहीतर शैक्षणिक आणि सरकारी कामात येवू शकते अडचण