संगमनेर | भाजप विधिमंडळाच्या नेता निवडीसाठी केंद्रीय कृषिमंत्री राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आल्यासरशी त्यांनी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतात जात शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, असा टोमणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मारला.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना उद्देशून तांबे यांनी आपल्या टि्वटर आणि फेसबुकवर हात जोडत आणि पाया पडत ही मागणी केली. मागणी मान्य करुन घेण्यासाठी आमच्याकडे आंदोलनाचाही मार्ग आहे, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

कृषिमंत्र्यांनी कृपया परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झालेल्या शेतांना आणि शेतकऱ्यांना भेटी द्यावी, तसेच भेटीअंती तत्काळ मदतदेखील द्यावी, असे नमूद करत नुकसानीचे फोटोदेखील तांबे यांनी फेसबुकवर टाकले आहेत.
- म्हातारपणात पण पैशांची तंगी भासणार नाही! Post Office च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास दरमहा मिळणार 20 हजार रुपये व्याज
- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ भागातील पाणी पुरवठा 30 ऑक्टोबर रोजी बंद राहणार, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
- तुमच्या मालकी जमिनीवर विजेचा खांब गाडलेला असेल तर मोबदला मिळणार का ? कायदा काय सांगतो ?
- इलेक्ट्रिक कारच्या चाहत्यांसाठी गोड बातमी ! लाँच होणार ‘या’ 5 नवीन Electric Cars
- रेशन कार्ड धारकांसाठी सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय ! ऐतिहासिक निर्णयाचा फायदा होणार की तोटा ? वाचा सविस्तर













