मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. मुंबईत चार दिवसांसाठी सर्व प्रकारची दारुविक्री बंद राहणार असल्याची माहिती मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत सलग तीन दिवस तसेच २४ ऑक्टोबर रोजी एक दिवस अशा एकूण चार दिवसांसाठी मुंबई शहरात सर्व प्रकारच्या दारुविक्रीवर बंदी असेल त्यामुळे सर्व दारुची दुकाने बंद ठेवण्यात येतील.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत नुकतीच संपली असून आता अर्जांची छाननी सुरु आहे. उद्या ७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर एकदा उमेदवारी निश्चित झाली की दोन दिवसांत प्रचाराचे नारळ फुटतील आणि राज्यात प्रचाराला वेग येईल. दरम्यान, राज्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी ! 15 जून पासून ‘हा’ नवीन निर्णय लागू होणार
- राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी ! 11व्या हफ्त्याची तारीख ठरली
- 18 मे 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांची आर्थिक भरभराट होणार !
- ‘ही’ आहेत पुण्यातील टॉप 5 इंजीनियरिंग कॉलेज, इथं ऍडमिशन मिळालं म्हणजे लाईफ सेट झाली म्हणून समजा !
- ‘या’ महत्वाच्या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन !