मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. मुंबईत चार दिवसांसाठी सर्व प्रकारची दारुविक्री बंद राहणार असल्याची माहिती मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत सलग तीन दिवस तसेच २४ ऑक्टोबर रोजी एक दिवस अशा एकूण चार दिवसांसाठी मुंबई शहरात सर्व प्रकारच्या दारुविक्रीवर बंदी असेल त्यामुळे सर्व दारुची दुकाने बंद ठेवण्यात येतील.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत नुकतीच संपली असून आता अर्जांची छाननी सुरु आहे. उद्या ७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर एकदा उमेदवारी निश्चित झाली की दोन दिवसांत प्रचाराचे नारळ फुटतील आणि राज्यात प्रचाराला वेग येईल. दरम्यान, राज्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
- कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना…IPL 2025 आधीच MS Dhoni चर्चेत
- लाडक्या बहिणींसाठी अखेर ती गुड न्यूज आलीच, ‘या’ तारखेला दोन महिन्यांचे हप्ते महिलांच्या खात्यात येणार, 3,000 की 4,200?
- Big Breaking ! ग्रामसभेतून सरपंचासह विखे समर्थकांनी काढला प्रळ ! ग्रामसभेत बहुमताने…
- 400Km मायलेज, 360-डिग्री कॅमेरा आणि AI सपोर्ट – Hyundai Venue EV बद्दल हे तुम्हाला माहीत आहे का
- Volvo ES90 EV : 700 किमी रेंजसोबत BMW आणि Mercedes ला टक्कर देणारी इलेक्ट्रिक सेडान आली !