बारामती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील भाषणानंतर काही अंतरावर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी समर्थक युवकांनी ‘एकच वादा– अजितदादा…’ अशी घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांनी काही युवकांवर सौम्य लाठीमार करत त्यांना ताब्यात घेतले.
मुख्यमंर्त्यांच्या महाजनादेश यात्रेचे आगमन बारामती शहरात दुपारी साडेतीन वाजता झाले. या वेळी मुख्यमंर्त्यांच्या सभेपूर्वी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे भाषण झाले. यानंतर मुख्यमंर्त्यांचे तेरा मिनिटांचे भाषण झाले.

या भाषणानंतर मुख्यमंत्री जनादेश यात्रेतील रथातून उतरून जात असताना काही अंतरावर असलेल्या युवकांनी एकच वादा… अजितदादा… अशा घोषणा दिल्या. या वेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी काही युवकांवर सौम्य लाठीमार केला.
यानंतर घोषणाबाजी करणारे युवक पळाले. यातील काही युवकांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभाजवळ युवकांनी ठाण मांडून घोषणाबाजी केली.
दरम्यान, मुख्यमंर्त्यांच्या जनादेश यात्रेत धनगर आरक्षण प्रश्नावरून आंदोलनाचा इशारा देणारे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, भाग्यश्री धायगुडे यांच्यासह दहा कार्यकर्त्यांना अगोदरच पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. या कार्यकर्त्यांना एमआयडीसी येथील पेन्सिल चौकात ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
- आता कॅश डिपॉजिटसाठी बँकेत जायची गरज नाही, UPI नेच जमा करता येईल पैसे; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस!
- IBPS PO Jobs 2025: IBPS अंतर्गत “प्रोबेशनरी ऑफिसर” पदाची मेगा भरती सुरू; तब्बल 5208 जागांसाठी भरती सुरू
- मशरूम शाकाहारी आहे की मांसाहारी?, खरं उत्तर ऐकून धक्का बसेल!
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
- व्यक्तीच्या तळहातावरील रेषा सांगतात त्यांचे गुपित व्यक्तिमत्व, ‘या’ चिन्हांवरून ओळखा गुण आणि दोष!