बारामती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील भाषणानंतर काही अंतरावर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी समर्थक युवकांनी ‘एकच वादा– अजितदादा…’ अशी घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांनी काही युवकांवर सौम्य लाठीमार करत त्यांना ताब्यात घेतले.
मुख्यमंर्त्यांच्या महाजनादेश यात्रेचे आगमन बारामती शहरात दुपारी साडेतीन वाजता झाले. या वेळी मुख्यमंर्त्यांच्या सभेपूर्वी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे भाषण झाले. यानंतर मुख्यमंर्त्यांचे तेरा मिनिटांचे भाषण झाले.

या भाषणानंतर मुख्यमंत्री जनादेश यात्रेतील रथातून उतरून जात असताना काही अंतरावर असलेल्या युवकांनी एकच वादा… अजितदादा… अशा घोषणा दिल्या. या वेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी काही युवकांवर सौम्य लाठीमार केला.
यानंतर घोषणाबाजी करणारे युवक पळाले. यातील काही युवकांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभाजवळ युवकांनी ठाण मांडून घोषणाबाजी केली.
दरम्यान, मुख्यमंर्त्यांच्या जनादेश यात्रेत धनगर आरक्षण प्रश्नावरून आंदोलनाचा इशारा देणारे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, भाग्यश्री धायगुडे यांच्यासह दहा कार्यकर्त्यांना अगोदरच पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. या कार्यकर्त्यांना एमआयडीसी येथील पेन्सिल चौकात ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
- अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी लोकसहभागातून उभारला तब्बल ५ कोटी रूपयांचा बंधारा, बंधाऱ्याच्या पाण्यातून भाजीपाला बाजारावर निर्माण केला दबदबा!
- अवकाळी पाऊस पडला आणि काजवा महोत्सव संकटात! पावसाळ्यापूर्वीच भंडारदरा चर्चेत
- महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण विभागाचा नवीन निर्णय
- … म्हणून अजित पवारांचा फोटो मी कार्यालयात लावलाय! दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्यावरून खासदार लंकेंचं विधान
- खासदार निलेश लंके यांनी अधिकारी आणि ठेकेदाराच्या लगावली कानशिलात? मात्र काही घडलच नसल्याचं लकेंचं स्पष्टीकरण!