मुंबई : देशात बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. अनेक कंपन्यांतून कामगारांना मुक्त करण्याचे आदेश दिले जात आहेत. सत्ता हातात असताना रोजगार वाढवण्याचे काम करण्याऐवजी केंद्र सरकारने रोजगार घालवण्याचे काम केले असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी भाजपा सरकारवर केली.
नवी मुंबईतील सीवूड्स येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत पवारांनी पक्षांतर करणाऱ्यांनाही लक्ष्य केले.

पवार म्हणाले की, संबंध देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकांवर लागले आहे. इथे वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. सत्ता नसताना अडचणी आल्या, तर त्या दूर करण्याची हिंमत लागते, असा टोला त्यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना लगावला.
आज १६ हजार शेतकरी आत्महत्या करतात यासाठी गप्प बसायचे का? त्यांची चेष्टा करण्याचे काम आताचे सरकार करत आहे. ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली, त्यांच्या पंगतीत बसण्यामागे या नेत्यांचा काय दृष्टिकोन असावा? असा खोचक सवाल पवार यांनी केला.
- Friendship Day 2025: यंदाच्या फ्रेंडशिप डेला आपल्या खास मित्राला राशीनुसार द्या भेटवस्तू, नाते बहरेलच सोबत नशीबही उजळेल!
- न्यायाधीशांसमोरच वकीलावर जीवघेणा हल्ला : न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण
- ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरारासाठी सुरू होणार नवीन अनारक्षित एक्सप्रेस ट्रेन, वाचा सविस्तर
- गुलछडीच्या फुलांचा दरवळ; अर्ध्या एकर शेतीतून अहिल्यानगरचा शेतकरी कमवतोय लाखो रुपये!
- बैलगाडा शर्यत पाहायला गेला अन् जीवला मुकला शर्यतीचा मार्ग भरकटलेल्या बैलाच्या धडकेने एकाचा मृत्यू