मुंबई : देशात बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. अनेक कंपन्यांतून कामगारांना मुक्त करण्याचे आदेश दिले जात आहेत. सत्ता हातात असताना रोजगार वाढवण्याचे काम करण्याऐवजी केंद्र सरकारने रोजगार घालवण्याचे काम केले असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी भाजपा सरकारवर केली.
नवी मुंबईतील सीवूड्स येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत पवारांनी पक्षांतर करणाऱ्यांनाही लक्ष्य केले.

पवार म्हणाले की, संबंध देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकांवर लागले आहे. इथे वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. सत्ता नसताना अडचणी आल्या, तर त्या दूर करण्याची हिंमत लागते, असा टोला त्यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना लगावला.
आज १६ हजार शेतकरी आत्महत्या करतात यासाठी गप्प बसायचे का? त्यांची चेष्टा करण्याचे काम आताचे सरकार करत आहे. ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली, त्यांच्या पंगतीत बसण्यामागे या नेत्यांचा काय दृष्टिकोन असावा? असा खोचक सवाल पवार यांनी केला.
- मोठी बातमी ! महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा, ‘या’ शहरात तयार होणार नवीन रेल्वेस्थानक
- तिरुपती बालाजीला जाणाऱ्या भक्तांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून चालवली जाणार विशेष ट्रेन
- ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांना मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट !
- ३२३ बोनस शेअर्सनंतर कंपनी आता गुंतवणूकदारांना देणार २४ मोफत शेअर्स !
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! नोव्हेंबरचा हफ्ता या तारखेला जमा होणार, वाचा नवीन अपडेट













