सांगली : कडकनाथ घोटाळा प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा, पुरग्रस्त, दुष्काळग्रस्तांना योग्य तो न्याय द्यावा, अशा मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमीकावा करत मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकून आंदोलन केले.
यावेळी भाजप सरकारचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना खासगी सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की करत मार्गातून बाजूला केले. यात चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कडकनाथ घोटाळा प्रकरणी आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता. त्यानंतर पोलीसही कार्यकर्त्यांच्या मागावर होते; मात्र त्यांना चकवा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पलूस-ताकारी मार्गावर एका शेतात बसून, अचानक मुख्यमंत्र्याच्या ताफ्यावर केलेल्या या गनीमी आंदोलनामुळे सर्वत्र खळबळ उडाली.
दरम्यान मुख्यमंर्त्यांनी सांगलीतील सभेमध्ये कडकनाथ प्रकरणाला बगल देत, केवळ दुष्काळी भागाला पाणी देवू, असे आश्वासन दिले.
- केस गळतात? पातळ वाटतात?, मग ‘हे’ देशी उपाय करा आणि 10 दिवसांतच पहा कमाल फरक!
- AC चा ‘ड्राय मोड’ नेमका कधी आणि का वापरतात?, बऱ्याच जणांना याचा खरा उपयोग माहीतच नसेल!
- 1008 शिवमूर्ती, 135 फूट उंच शिखर आणि 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन एकाच ठिकाणी! भारतातील कोणत्या राज्यात आहे हे अनोखं मंदिर?
- दरमहा ₹61,000 पेन्शन मिळवण्याचा भन्नाट फॉर्म्युला! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवू शकते करोडपती, जाणून घ्या सविस्तर
- महाराष्ट्रातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी !