मुंबई: लोकसभेत वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो असे सांगून टीव्ही, वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी केला.
आंबेडकर यांनी साेमवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही, असे सांगितले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मलिक म्हणाले, आंबेडकर हे लोकसभेत वेगळे लढले होते. त्यांना आमच्याशी आघाडी नकोच आहे.

आता विधानसभेलाही त्यांना वेगळेच लढायचे आहे. वंचितमुळे मतविभाजन होऊन त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होत असल्याचे राज्यातील जनतेला कळून चुकले आहे. जनतेने लोकसभेत जी चूक केली ती पुन्हा विधानसभेत करणार नाहीत.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी विधानसभेत मित्रपक्षांना सोबत घेऊन ताकदीने लढवणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
- महाराष्ट्र किंवा गुजरात नाही तर ‘या’ प्रदेशात आहे देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन! जबरदस्त टेक्नॉलॉजीमुळे ठरते सर्वात खास
- नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? मग थोडं थांबा! पुढच्या आठवड्यात ‘या’ 3 दमदार स्मार्टफोन्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट
- देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा, पेन्शनबाबत समोर आली आनंदाची बातमी! वाचा काय बदल होणार?
- जिओ वापरकर्त्यांसाठी धमाका प्लॅन्स! 24GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि…; फक्त ‘इतक्या’ रुपयांत
- महाराष्ट्रालाही टाकलं मागे! भारतातील ‘हे’ राज्य आहे सर्वात हुशार, येथील प्रत्येक विद्यार्थी आहे स्मार्ट; IQ लेव्हल ऐकून तर थक्क व्हाल