अहमदनगर :- महापालिकेचा माळीवाडा येथील कचरा रॅम्प स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनानंतर मनपाने ४५ दिवसांत हा रॅम्प स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, अद्याप रॅम्पचे स्थलांतर झाले नसल्याने आंदोलन छेडण्यात येईल.
प्रसंगी महापौर व आयुक्तांच्या वाहनांवर कचरा टाकला जाईल, असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी सोमवारी दिला. मनसेच्या वतीने १९ जुलैला माळीवाडा भागातील शाळेजवळ असलेला कचरा रॅम्प स्थलांतर करावा या मागणीसाठी आंदोलन केले होते.

रॅम्प स्थलांतरित केल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांनाही व्यवस्थापनाने लेखी पत्र दिले होते. ४५ दिवसांत रॅम्प हटवला जाईल व ४ नवीन कॅम्पॅक्टर खरेदी करून हा कचरा शहरातील विभागनिहाय संकलन केला जाईल.
कचरा रॅम्पही बंद होईल, असेही सांगण्यात आले होते. परंतु ५० दिवस उलटूनही रॅम्प स्थलांतरित अथवा तेथून हटवलेला नाही. त्यामुळे आम्ही आमच्या यापूर्वी दिलेल्या आंदोलनाच्या इशाराऱ्यावर ठाम आहोत. कचऱ्याच्या गाड्या रॅम्पपर्यंत पोहोचू देणार नाही.
पाच दिवसांत हे आंदोलन चिघळणार असून कचरा गाड्या, कर्मचारी व अधिकाऱ्यांना संरक्षण द्यावे. प्रसंगी कचऱ्याची गाडी आयुक्त व महापौरांच्या गाडीवर डंपिंग होईल, असा इशारा भुतारे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
- सोन्याच्या किंमतीत मोठा बदल ! 20 एप्रिल 2025 रोजीचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 10 ग्रॅम सोन्याचे रेट चेक करा
- आता टेन्शन मिटणार ! 27 वर्षांची प्रतीक्षा संपली, 28 एप्रिल 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, आयुष्य पूर्ण बदलणार, वाचा सविस्तर
- महाराष्ट्रातील 17 लाख राज्य कर्मचारी आणि 12 लाख पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! महागाई भत्ता वाढ झाली निश्चित, किती वाढेल DA ?
- गुड न्यूज ! अहिल्यानगरला मिळणार नवा रेल्वे मार्ग, ‘या’ शहरांमधून जाणार नवा Railway मार्ग, सरकारने दिली मंजुरी, कसा असेल रूट ? पहा…
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगात सरकार ‘या’ 35 पदावर करणार नवीन नियुक्त्या