बीड : वंचित, ओबीसी बांधवांना मोदी सरकारच्या काळात संवैधानिक दर्जा मिळाला. त्यामुळे हा घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. ७० वर्षांत जे पक्ष सत्तेत होते, त्यांनी विकास का केला नाही? असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला.
संत भगवान बाबा व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड मजुरांच्या कल्याणाचा सतत विचार केला. भाजप सरकार त्यांच्याच विचारांवर कारभार करत असल्याचे सांगून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग त्यांनी फुंकले.

संत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे मंगळवारी (दि.८) दसरा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास अमित शहा यांनी संबोधित केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भूपेंद्र यादव, विजय पुराणिक, पालकमंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयदत्त क्षीरसागर, महादेव जानकर, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, ओमराजे निंबाळकर, सुजय विखे पाटील यांच्यासह बीड व अहमदगनर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
- तब्बल 7100mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 16GB रॅमसह OnePlus चे दोन भन्नाट फोन लवकरच,किंमत किती असणार?
- बापरे! अहिल्यानगरमध्ये गेल्या ५ महिन्यात तब्बल ९४० महिला अन् २४६ अल्पवयीन मुली झाल्या बेपत्ता, धक्कादायक कारणं आली समोर
- OTT आणि अनलिमिटेड डेटा हवाय? मग हे जिओ प्लॅन्स तुमच्यासाठीच! पाहा बेस्ट रिचार्ज प्लॅन्सची यादी
- सोन्याच्या किमतीत मोठी घसरण ! 17 जून 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे 22 आणि 24 कॅरेटचे दर ऐकून बसेल धक्का
- सहकारात राजकारण आणू नये, आमदार काशिनाथ दाते कृतज्ञता मेळाव्यात आवाहन