मुंबई : बेरोजगारी हा सामाजिक प्रश्न असून युवकांची होणारी सामाजिक कुचंबना, महागाई, वाढीव शुल्क यामुळे पालकांवरील अवलंबित्व लक्षात घेता, राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळण्याच्या किमान 02 वर्षेपर्यंत दरमहा 5000 रु. बेरोजगार भत्ता देण्याचे आमच्या सरकारचे धोरण असेल असेही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
सरकारी पद भरतीचा विषय राज्यभर तापलेला असताना, सरकारबद्दल विद्यार्थ्यांची तीव्र नाराजी आहे. महाराष्ट्र युवक कॉंग्रेसने आपल्या स्वतंत्र जाहीरनाम्यात या धोरणांवर भर दिला असल्याने त्याला परीक्षार्थीकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र युवक कॉंग्रेस युवकांचा जाहीरनामा ५ ऑक्टोबर रोजी प्रकाशित करत असून त्यात बेरोजगारीच्या प्रश्नांचा प्राधान्याने उल्लेख असल्याची माहिती महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.
- खाते रिकामे असतानाही UPI पेमेंट शक्य! UPI च्या नव्या फीचरमुळे युजर्सना काय होणार फायदा?
- शासनाचा दणका! ६८ हजार रेशन कार्डधारकांचा लाभ बंद, तुमचं नाव यादीत आहे का?
- नवीन आधार अॅप 28 जानेवारीला लॉन्च; मोबाईल नंबर, पत्ता अपडेट घरबसल्या शक्य
- आयुष्मान भारत योजनेत वर्षभरात किती वेळा घेता येतात उपचार? जाणून घ्या सविस्तर नियम
- FASTag वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा ! १ फेब्रुवारी २०२६ पासून कार FASTag वर KYV पडताळणी रद्द













