चंद्रपूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देशभक्त होते. त्यांच्या देशभक्तीवर शंका नाही. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसने त्यांच्यावर सतत अन्याय केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी मंगळवारी चंद्रपुरात पत्रकारांशी बोलताना केला.
सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी पुढे आली तर काँग्रेसचे नेते अस्वस्थ व्हायला लागतात. यामागील कारण अद्याप कळालेले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दोनदा शिक्षा भोगणारे सावरकर हे एकमेव नेते होते.

मात्र, काँग्रेसने त्यांच्यावर सतत अन्याय केला. आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोपरांत न्याय मिळेल, असे शाहनवाज हुसेन यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर तेथील शांतता भंग होऊ नये म्हणून माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
- 3 दिवसानंतर आज सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्यात ! 04 मार्च 2025 रोजी 10 ग्रॅम Gold ची किंमती किती ? महाराष्ट्रात कशी आहे स्थिती ?
- पुण्याला मिळणार नवा आठपदरी ग्रीनफिल्ड Expressway ! 2 वर्षात तयार होणार ‘हा’ 745 किलोमीटर लांबीचा महामार्ग, कसा असेल रूट ?
- Pune आणि पिंपरी-चिंचवडकरांनो ‘या’ भागात 5 एकर जमिनीवर नवीन गृहप्रकल्प तयार होणार ! महापालिका किती हजार घरे बांधणार ?
- मुंबई – पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी !
- Dhanjay Munde Resigned : अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा ! धनंजय मुंडेंनी घेतला मोठा निर्णय…