नगर : ‘मातोश्रीपर्यंत जाणे म्हणजे काही ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यासाठी अत्यंत निष्ठावंत लोक लागतात, जे गेल्या ३५ वर्षांपासून काम करतात. मला जे शिवसेनेचे तिकीट मिळाले, हे निष्ठेचे फळ आहे,’ अशी भावना राठोड यांनी व्यक्त केली.
‘गेल्या काही महिन्यांपासून नगर शहरात काहीजणांच्या शिवसेनेत प्रवेशाबद्दल खोट्या अफवा होत्या, पण त्यात काही तथ्य नव्हते. माझी उमेदवारी जाहीर झाल्याने नगरमधील खोट्या अफवा बंद झाल्या आहेत,’ असेही त्यांनी कोणाचेही नाव न घेता आवर्जून स्पष्ट केले.

नगर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा एबी फॉर्म घेवून नगरला राठोड आल्यावर केडगावकरांनी रंगोली चौकात त्यांचे स्वागत केले. या वेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, ‘नगर शहराला राठोड यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री मिळणार आहे.
नगर शहराचा विकास शिवसेनाच करणार, हा विश्वास जनतेला आहे. ज्यांनी पाच वर्षात नगरकरांना फक्त विकासाचा गप्पा आणि थापा दिल्या, त्याही बंद होतील.’
- समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ 3 दिवस महामार्ग बंद ठेवला जाणार, कारण काय?
- यावर्षी सोन्याच्या किमतीत 70% आणि चांदीच्या किमतीत 150 टक्क्यांची वाढ ; 2026 मध्ये सोन आणखी किती वाढणार ?
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! OYO चा IPO येणार, महत्त्वाच्या प्रस्तावाला मिळाली मंजुरी, वाचा डिटेल्स
- १५ तासांचा प्रवास फक्त साडेचार तासात ! महाराष्ट्राला मिळणार आणखी एक बुलेट ट्रेन, कसा असणार मार्ग?
- मुंबई, ठाण्यात घर शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! नव्या वर्षात हजारो घरांसाठी म्हाडा प्राधिकरण लॉटरी काढणार, कधी निघणार जाहिरात?