नगर : ‘मातोश्रीपर्यंत जाणे म्हणजे काही ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यासाठी अत्यंत निष्ठावंत लोक लागतात, जे गेल्या ३५ वर्षांपासून काम करतात. मला जे शिवसेनेचे तिकीट मिळाले, हे निष्ठेचे फळ आहे,’ अशी भावना राठोड यांनी व्यक्त केली.
‘गेल्या काही महिन्यांपासून नगर शहरात काहीजणांच्या शिवसेनेत प्रवेशाबद्दल खोट्या अफवा होत्या, पण त्यात काही तथ्य नव्हते. माझी उमेदवारी जाहीर झाल्याने नगरमधील खोट्या अफवा बंद झाल्या आहेत,’ असेही त्यांनी कोणाचेही नाव न घेता आवर्जून स्पष्ट केले.

नगर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा एबी फॉर्म घेवून नगरला राठोड आल्यावर केडगावकरांनी रंगोली चौकात त्यांचे स्वागत केले. या वेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, ‘नगर शहराला राठोड यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री मिळणार आहे.
नगर शहराचा विकास शिवसेनाच करणार, हा विश्वास जनतेला आहे. ज्यांनी पाच वर्षात नगरकरांना फक्त विकासाचा गप्पा आणि थापा दिल्या, त्याही बंद होतील.’
- अगदी घरी बसून येईल तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स; प्रत्येक दुरूस्तीही होते घरच्याघरी, कशी? तर वाचा
- 10 रुपयांच्या कॉइनबाबत रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून नवीन गाईडलाईन जारी ! समोर आली मोठी अपडेट
- घरी बसून पेन्शन घ्यायचीय? मग सरकारच्या ‘या’ योजनेची माहिती तुम्हाला हवीच; 1 लाखांपर्यंत मिळेल पेन्शन
- लग्नासाठी कर्ज कोण देतं? अटी काय असतात? कागदपत्रे कोणती लागतात? वाचा सगळी माहिती
- तुमच्या घरावरुन कुणाचं विमान उडतंय..भारताचं की दुश्मनाचं? एका क्लिकमध्ये ‘असं’ करा चेक