नगर : ‘मातोश्रीपर्यंत जाणे म्हणजे काही ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यासाठी अत्यंत निष्ठावंत लोक लागतात, जे गेल्या ३५ वर्षांपासून काम करतात. मला जे शिवसेनेचे तिकीट मिळाले, हे निष्ठेचे फळ आहे,’ अशी भावना राठोड यांनी व्यक्त केली.
‘गेल्या काही महिन्यांपासून नगर शहरात काहीजणांच्या शिवसेनेत प्रवेशाबद्दल खोट्या अफवा होत्या, पण त्यात काही तथ्य नव्हते. माझी उमेदवारी जाहीर झाल्याने नगरमधील खोट्या अफवा बंद झाल्या आहेत,’ असेही त्यांनी कोणाचेही नाव न घेता आवर्जून स्पष्ट केले.

नगर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा एबी फॉर्म घेवून नगरला राठोड आल्यावर केडगावकरांनी रंगोली चौकात त्यांचे स्वागत केले. या वेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, ‘नगर शहराला राठोड यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री मिळणार आहे.
नगर शहराचा विकास शिवसेनाच करणार, हा विश्वास जनतेला आहे. ज्यांनी पाच वर्षात नगरकरांना फक्त विकासाचा गप्पा आणि थापा दिल्या, त्याही बंद होतील.’
- Bank of Baroda LBO Jobs 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये मेगाभरती! LBO पदाच्या 2500 जागांसाठी भरती सुरू
- महाभयंकर प्रलयानंतरही ‘हे’ शहर किंचितही हलणार नाही, भगवान शंकराच्या प्रिय नगरीचं रहस्य तुम्हाला थक्क करेल!
- वाहन चालकांसाठी गुड न्यूज! ‘या’ राष्ट्रीय महामार्गांवरील टोल थेट अर्ध्यावर, सरकारकडून 50% कपातीची घोषणा
- काय सांगता ! ‘ही’ सोपी ट्रिक वापरून तुम्ही साप विषारी आहे की बिनविषारी हे ओळखू शकता
- अवघ्या 65 दिवसांत घटवलं 11 किलो वजन, कपिल शर्माचं फिटनेस सिक्रेट उघड! जाणून घ्या 21-21-21 फॉर्म्युला