इस्लामपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाचे काटे बंद पडले आहेत. त्यांचे आता काही काम उरलेले नाही, असे राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी गद्दारांना महायुतीत थारा न देण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज्याच्या भल्यासाठी महायुतीची घोषणा केली. पण उमेदवारी मिळाली नाही, म्हणून महायुतीची साथ सोडणाऱ्या बांडगुळांना पुन्हा महायुतीत प्रवेश देणार नाही.

यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट करत, उध्दव ठाकरेंनी येथील यल्लमा चौकात महायुतीने सत्तेत आल्यानंतर कामे केली म्हणूनच धनगर, मुस्लिम समाज युतीसोबत असल्याचा दावा केला.
अस्थिर सरकारला शिवसेनेने स्थिर केले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठवले. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीने तुंबड्या भरायचे काम केले, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
- खाते रिकामे असतानाही UPI पेमेंट शक्य! UPI च्या नव्या फीचरमुळे युजर्सना काय होणार फायदा?
- शासनाचा दणका! ६८ हजार रेशन कार्डधारकांचा लाभ बंद, तुमचं नाव यादीत आहे का?
- नवीन आधार अॅप 28 जानेवारीला लॉन्च; मोबाईल नंबर, पत्ता अपडेट घरबसल्या शक्य
- आयुष्मान भारत योजनेत वर्षभरात किती वेळा घेता येतात उपचार? जाणून घ्या सविस्तर नियम
- FASTag वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा ! १ फेब्रुवारी २०२६ पासून कार FASTag वर KYV पडताळणी रद्द













