इस्लामपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाचे काटे बंद पडले आहेत. त्यांचे आता काही काम उरलेले नाही, असे राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी गद्दारांना महायुतीत थारा न देण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज्याच्या भल्यासाठी महायुतीची घोषणा केली. पण उमेदवारी मिळाली नाही, म्हणून महायुतीची साथ सोडणाऱ्या बांडगुळांना पुन्हा महायुतीत प्रवेश देणार नाही.

यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट करत, उध्दव ठाकरेंनी येथील यल्लमा चौकात महायुतीने सत्तेत आल्यानंतर कामे केली म्हणूनच धनगर, मुस्लिम समाज युतीसोबत असल्याचा दावा केला.
अस्थिर सरकारला शिवसेनेने स्थिर केले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठवले. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीने तुंबड्या भरायचे काम केले, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
- जगन्नाथ पुरी यात्रेतून परतताना ‘या’ 2 वस्तु नक्की घरी आणा, घरात कधीच अन्नाचा तुटवडा भासणार नाही!
- SBI कडून Home Loan च्या व्याजदरात मोठी कपात ! 50 लाखांच्या गृह कर्जासाठी मासिक किती पगार हवा ?
- नवीन काळ्या जीन्सची चमक आणि रंग जाऊ नये, यासाठी वापरा बेस्ट घरगुती ट्रिक!
- Google Pay, PhonePe किंवा पेटीएमवरून चुकीच्या खात्यावर पैसे सेंड झाले? मग घाबरू नका! ‘या’ 4 स्टेप्स वापरुन मिळवता येतील पैसे
- तब्बल 25 कोटी तिकीटांची विक्री, 1975 मध्ये आलेल्या ‘या’ भारतीय चित्रपटाचा रेकॉर्ड आजही कायम!