इस्लामपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाचे काटे बंद पडले आहेत. त्यांचे आता काही काम उरलेले नाही, असे राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी गद्दारांना महायुतीत थारा न देण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज्याच्या भल्यासाठी महायुतीची घोषणा केली. पण उमेदवारी मिळाली नाही, म्हणून महायुतीची साथ सोडणाऱ्या बांडगुळांना पुन्हा महायुतीत प्रवेश देणार नाही.

यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट करत, उध्दव ठाकरेंनी येथील यल्लमा चौकात महायुतीने सत्तेत आल्यानंतर कामे केली म्हणूनच धनगर, मुस्लिम समाज युतीसोबत असल्याचा दावा केला.
अस्थिर सरकारला शिवसेनेने स्थिर केले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठवले. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीने तुंबड्या भरायचे काम केले, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
- मोठी बातमी ! मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे नाही तर आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सुरु होणार मेट्रो
- 3 दिवसानंतर आज सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्यात ! 04 मार्च 2025 रोजी 10 ग्रॅम Gold ची किंमती किती ? महाराष्ट्रात कशी आहे स्थिती ?
- पुण्याला मिळणार नवा आठपदरी ग्रीनफिल्ड Expressway ! 2 वर्षात तयार होणार ‘हा’ 745 किलोमीटर लांबीचा महामार्ग, कसा असेल रूट ?
- Pune आणि पिंपरी-चिंचवडकरांनो ‘या’ भागात 5 एकर जमिनीवर नवीन गृहप्रकल्प तयार होणार ! महापालिका किती हजार घरे बांधणार ?
- मुंबई – पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी !