अहमदनगर :- शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. अशा कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून विविध पदांवर नियुक्ती करून त्यांना न्याय देण्यात येत आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची पावती या पदाच्या माध्यमातून मिळत आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे.

File Photo : Anil Rathod
कारण शिवसेनाच सर्वसामान्यांना जवळची वाटत असल्याने शिवसैनिकांनी त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. विजय सानप यांनी उपनगरात शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे चांगले प्रयत्न केले आहेत,
असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. शिवसेनेच्या उपशहरप्रमुखपदी विजय सानप यांची नियुक्ती करून उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
- PGCIL Recruitment 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 115 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी, ‘इतका’ वाढला महागाई भत्ता, जीआर पण निघाला
- व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये सुधारणा ! स्टॉक Hold करावा, SELL करावा की BUY ? तज्ज्ञांनी स्पष्टचं सांगितलं
- Tata ग्रुपचा ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल, 95% रिटर्न मिळणार
- Post Office च्या टाईम डिपॉझिट योजनेत चार लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार? पहा…