अहमदनगर :- शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. अशा कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून विविध पदांवर नियुक्ती करून त्यांना न्याय देण्यात येत आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची पावती या पदाच्या माध्यमातून मिळत आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे.

File Photo : Anil Rathod
कारण शिवसेनाच सर्वसामान्यांना जवळची वाटत असल्याने शिवसैनिकांनी त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. विजय सानप यांनी उपनगरात शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे चांगले प्रयत्न केले आहेत,
असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. शिवसेनेच्या उपशहरप्रमुखपदी विजय सानप यांची नियुक्ती करून उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
- महाभारत काळाच्या आधीपासून अस्तित्वात असलेले ‘हे’ झाड अजूनही जिवंत, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालीये नोंद!
- महाराष्ट्रातील चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! 2016 नंतर प्रथमच असं घडणार, शालेय शिक्षण विभागाचा आदेश
- पाकिस्तानमधील 5 सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंची यादी, एकजण कोट्यवधींचा मालक असूनही खातोय जेलची हवा!
- मागासवर्गीयांचा निधी न वापरल्याने कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतच केली बरखास्त ; ग्रामविकास मंत्रालयाचा आदेश
- सुपा पोलिसांच्या ताब्यातील परप्रांतीय तरुणाचा मृत्यू ; सीआयडी उकलणार गूढ!