नगर :- शहरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी दारुड्या वाहनचालकांच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.
मागील सात महिन्यांत तब्बल एक हजार मद्यधुंद वाहनचालकांना पकडून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यापैकी अनेकांना दंडात्मक, तर काहींना थेट तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
दारू पिऊन वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा मद्यपींवर केवळ ३१ डिसेंबरच्या रात्रीच सक्षमपणे कारवाई करण्यात येते. आता मात्र पोलिसांनी या मद्यपी वाहनचालकांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू केली आहे.
कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिस ठाणे तसेच वाहतूक नियंत्रण शाखा व पोलिस अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे ही मोहीम राबवण्यात येत आहे. राज्याच्या रस्ता सुरक्षा समितीनुसार अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
अपघातांचे हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी नगर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. शहर परिसरात रात्रीच्या वेळी अचानक नाकाबंदी करून वाहनचालक दारू पिले आहेत काय? याची ब्रेथ ऑनालायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईमुळे सुसाट सुटलेल्या मद्यपींना चाप बसत आहे.
- डोंबिवली ते हिमाचल प्रदेश…भारतातील ‘ही’ 6 रेल्वे स्थानके खरंच भुताने पछाडलेली?, प्रवासी आजही पाय ठेवायलाही थरथरतात!
- भारतात कोणत्या राज्यात धावतात सर्वाधिक ट्रेन, कमाईच्या बाबतीत कोण देतं सर्वाधिक उत्पन्न? वाचा स्पेशल रिपोर्ट!
- एखादं गाव वसवता येईल इतकं मोठं…’हे’ आहे भारताचं सर्वात मोठं विमानतळ! पाहा खास वैशिष्ट्यं
- मंगळवारी आणि शनिवारी करा हनुमान चालीसा पठन, बजरंगबलीच्या कृपेने सर्व संकट होतील दूर!
- संगमनेरमधील रायते गावच्या सरपंचाने अतिक्रमण केल्यामुळे सरपंचपद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय