नगर :- शहरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी दारुड्या वाहनचालकांच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.
मागील सात महिन्यांत तब्बल एक हजार मद्यधुंद वाहनचालकांना पकडून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यापैकी अनेकांना दंडात्मक, तर काहींना थेट तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
दारू पिऊन वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा मद्यपींवर केवळ ३१ डिसेंबरच्या रात्रीच सक्षमपणे कारवाई करण्यात येते. आता मात्र पोलिसांनी या मद्यपी वाहनचालकांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू केली आहे.
कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिस ठाणे तसेच वाहतूक नियंत्रण शाखा व पोलिस अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे ही मोहीम राबवण्यात येत आहे. राज्याच्या रस्ता सुरक्षा समितीनुसार अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
अपघातांचे हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी नगर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. शहर परिसरात रात्रीच्या वेळी अचानक नाकाबंदी करून वाहनचालक दारू पिले आहेत काय? याची ब्रेथ ऑनालायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईमुळे सुसाट सुटलेल्या मद्यपींना चाप बसत आहे.
- धक्कादायक ! महाराष्ट्रात आढळलेत 88 लाख रेशन कार्डधारक संशयास्पद, संशयास्पद नागरिकांचे रेशन कार्ड होणार रद्द?
- कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच हक्क मिळणार का ? सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम निकाल !
- अहिल्यानगर शहराची हवा ही भाजप राष्ट्रवादी युतीच्या बाजूने – द ग्रेट खली एन्ट्रीने भाजपा राष्ट्रवादीच्या प्रचारात रंगत !
- मकर संक्रांतीआधी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हफ्ता पण मिळणार नाही का ? निवडणूक आयोगाचे आदेश सांगतात….
- सुखाचे दिवस सुरु होणार ! 16 जानेवारी 2026 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश













