नगर :- शहरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी दारुड्या वाहनचालकांच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.
मागील सात महिन्यांत तब्बल एक हजार मद्यधुंद वाहनचालकांना पकडून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यापैकी अनेकांना दंडात्मक, तर काहींना थेट तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
दारू पिऊन वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा मद्यपींवर केवळ ३१ डिसेंबरच्या रात्रीच सक्षमपणे कारवाई करण्यात येते. आता मात्र पोलिसांनी या मद्यपी वाहनचालकांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू केली आहे.
कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिस ठाणे तसेच वाहतूक नियंत्रण शाखा व पोलिस अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे ही मोहीम राबवण्यात येत आहे. राज्याच्या रस्ता सुरक्षा समितीनुसार अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
अपघातांचे हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी नगर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. शहर परिसरात रात्रीच्या वेळी अचानक नाकाबंदी करून वाहनचालक दारू पिले आहेत काय? याची ब्रेथ ऑनालायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईमुळे सुसाट सुटलेल्या मद्यपींना चाप बसत आहे.
- साईभक्तांसाठी महत्वाची बातमी! गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डीतील ‘ब्रेक दर्शन’ सेवा तात्पुरती ठेवण्यात येणार बंद
- अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, भंडारदरा धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
- जादा पैश्याचे आमिष दाखवून शिर्डीतील गुतंवणूकदारांना १ कोटी ६५ लाखांचा गंडा, ‘ग्रो मोर इनव्हेस्टमेंट’ कंपनीविरोधात गुन्हा दाखल
- महाराष्ट्रात सुख-समृद्धी, बंधूभाव नांदू दे, राज्यात भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पांडुरंगा चरणी प्रार्थना!
- आईबापानं पोत अन् गंठण शिवून पोराला शिकवलं, पोरानं सीए होत आईबापाच्या कष्टाचं पांग फेडलं, संगमनेरच्या विशालची प्रेरणादायी यशोगाथा