मुंबई : भाजपा हा सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी राज्यपालांची निश्चितच भेट घ्यावी. बहुमतासाठी ते निश्चितच १४५ आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर करतील, अशी अपेक्षा आहे.
मात्र काहीही झाले तरी महाराष्ट्रात मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचा पुनरुच्चार शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, हीच गोड बातमी सुधीर मुनगंटीवार देणार असल्याचेही राऊत म्हणाले. भाजपाने अद्यापि तरी कोणताही प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी गुरुवारी राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांनीच राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करावा, असे मी आधीच म्हणालो होतो.
- सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची रजेचे पैसै मिळण्यासाठी फरफट सुरूच, पैश्यासाठी वर्षाभरापासून कर्मचारी आहेत वेटिंगमध्ये
- आरबीआयचा देशातील आणखी एका मोठ्या बँकेला दणका ! ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण
- जागतिक मधमाशी दिन: मोबाईल टॉवर, रसायने आणि तापमानवाढीमुळे मधमाशी नष्ट होण्याच्या मार्गावर?
- श्रीरामपूरमध्ये विनापरवाना डीजे वाजवला तर पोलिसांची थेट कारवाई होणार, ड्रोनवरही घातली बंदी
- राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! राज्य सरकारचा नवा निर्णय जाहीर, GR पहा…