मुंबई : विधानसभा निवडणुका होताच नाशकात सिलिंडरचे दर तीन महिन्यांत तब्बल ११३ रुपयांनी वाढले आहेत. ऑगस्ट महिन्यात सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांची घट होऊन, दर ५६७ रुपये ५० पैसे होते.
त्यानंतर निवडणुका होताच सिलिंडरचे दर हळूहळू वाढत दि. १० नोव्हेंबरअखेर तब्बल ६८० रुपयांवर गेले आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या वेळी विनाअनुदानित सिलिंडरच्या (१४.२ किलो) भावात ७७ रुपयांनी वाढ झाली असून, याचा सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसला आहे.

राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. अजून नवे सरकार स्थापन झालेले नाही; मात्र राज्यात केंद्र सरकारने सिलिंडर दरवाढीचा सपाटा लावला आहे. गेल्या चार महिन्यांपासून दर महिन्याला सिलिंडरची दरवाढ होत आहे.
तीन महिन्यांत १४.२ किलोचे घरगुती सिलिंडरचे दर ११३ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. सप्टेंबरमध्ये १५.५० रुपये, तर ऑक्टोबरमध्ये १३ रुपयांनी दर वाढलेत.
- मुकेश अंबानीच्या अँटिलीया बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना मिळतो 2 लाख रुपयांपर्यंत पगार; नोकरी कशी मिळणार ? वाचा सविस्तर
- महाराष्ट्र चीन आणि स्वित्झर्लंडचा रेकॉर्ड मोडणार ; जगातील सर्वाधिक लांब काचेचा पूल महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तयार होणार !
- मुंबई ते हैदराबाद प्रवास होणार वेगवान ! महाराष्ट्रात तयार होणार नवा सुपरफास्ट एक्सप्रेस हायवे
- काय सांगता ! चक्क 500 वर्षानंतर तयार होतोय एक नवीन राजयोग, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
- शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात अचानक आला मोठा ट्विस्ट ! CM देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला महामार्गाचा नवीन अलाइनमेंट













