अहमदनगर :- काम न करणार पार्सल अखेर कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जनतेने परत पाठवले आहे. यंदाच्या विधानसभेत कर्जत जामखेड हा मतदार संघ राज्यात चांगलाच चर्चेत आला.
शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी गत सहा महिन्यांपासून चांगलाच जम बसविला होता रोहित पवार यांनी हि पूर्ण निवडणूक पूर्णता विकासाच्या प्रश्नावर लढवली.


धनगर आरक्षण, मतदार संघाकडे झालेलं दुर्लक्ष, तालुक्यातील मुलभूत प्रश्न आणि जनतेशी नसलेला संवाद ह्या कारणामुळे अखेर मंत्री राम शिंदे यांचा दारुण पराभव झाला.
निवडणूक प्रचारा दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस,उदयनराजे भोसले,पंकजा मुंडे, या भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या सभा ह्या मतदार संघात राम शिन्देसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या.
ह्या सभामधून रोहित पवारांवर बारामतीच पार्सल अशी टीका होत होती, या उलट रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर टीका न करता मतदारसंघातील प्रश्नांबाबत भूमिका मांडत मतदारांना आपलेस केल.
अखेर कर्जत जामखेड मध्ये मतदारांनी काम न करणार पार्सल अखेर घरी पाठवले असून विकास प्रश्नावर बोलणार्या रोहित पवार यांना आमदार बनविल आहे !
- राज्यातील 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 16 जूनपासून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार ‘ही’ सुविधा, परिवहन मंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
- अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘हे’ धरण 40 वर्षात पहिल्यांदाच जूनमध्ये ओव्हरफ्लो! 220 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू
- पाकिस्तानचे खायचेही वांदे, महागाईचा प्रचंड कहर! भारतात 30 रुपयांना मिळणारी भाजी थेट पोहोचली 400 रुपयांवर
- रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला किती पगार मिळतो? पगाराव्यतिरिक्त आणखी काय-काय सुविधा मिळतात, भत्ते किती मिळतात?
- फक्त 1 आठवड्यात दिसेल चमत्कार! चेहऱ्यासंबंधित ‘या’ प्रॉब्लेम्सवर जबरदस्त घरगुती उपाय नक्की बघा