कोपरगाव :- राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा विजय व युतीच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव अनेकांसाठी अनपेक्षित होता. कोल्हेंशिवाय अन्य उमेदवार निवडून येणे शक्य नाही, अशीच धारणा राजकीय वर्तुळात झाली होती, परंतु जनमानसात कोल्हेंबद्दल असलेल्या नाराजीचा फायदा घेत आशुतोष यांनी विजयश्री खेचून आणली.
त्यांच्या विजयामागे अनेक शिलेदार आहेत. छुपे मतदानही काळेंच्या पारड्यात पडले. मागच्या पराभवाचा वचपा काढत कमी फरकाने का होईना, परंतु ते निवडून आले. निवडणूक काळात काळे समर्थक विजय आढाव गट कोल्हेंना जाऊन मिळाला, नितीन औताडेंनीही समर्थन दिले.

शिवाय सेनेतील राजेंद्र झावरे गटाचीही मदत झाल्याने कोल्हे यांचे पारडे जड झाले. काळे यांनी वेगळी रणनिती अवलंबली. मुस्लिम मतदार आपल्याकडे वळवले. कोल्हेंवर नाराज असणाऱ्यांनी काळेंना मदत केली. राजेश परजणे व विजय वहाडणेंचा विखारी प्रचार कोल्हेंविरुद्ध चालूच होता, तो काळेंच्या पथ्यावर पडला.
कोल्हे व समर्थकांना फाजील आत्मविश्वास नडला. कोल्हेंनी वहाडणेंना नाहक महत्त्व देऊन टीका केली. काळे व परजणे स्पर्धकच नाहीत, या थाटात त्यांनी प्रचार केला. कोल्हेंनी केलेली कामे निवडून येण्यासाठी पुष्कळ होती, परंतु जनतेने त्यांना नाकारले.
- अहिल्यानगरमधील अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या संपर्कात; वारं केव्हाही, कसंही फिरू शकतं- अंबादास दानवे
- अहिल्यानगर जिल्ह्यातील केळी पोहोचली थेट इराणला ! ३ एकर बागेतून ८ लाखांचं उत्पन्न
- शिवसेनेने आंदोलनाचा इशारा देताच अभियंत्यानी केली सीना नदीच्या पुलाची पाहणी, काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बिल देऊ नका शिवसेनेची मागणी
- जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद साधत दिला आधार
- महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात एक हजार कोटी रुपयांचा कॉम्प्रेसरचा प्रकल्प उभारला जाणार ! रोजगारनिर्मितीसह राज्याचा चेहरा-मोहरा बदलणार