अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पुलात बाधीत होणाऱ्या खासगी मालमत्ताधारकांना २५ नोव्हेंबरपर्यंत हमीपत्र भरून देण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. हमीपत्र भरून दिल्यामुळे मालमत्ताधारकांना सुमारे २५ टक्के आर्थिक नुकसान टाळता येणार आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी सोमवारी दिली.
उड्डाणपुलाच्या भूसंपादन प्रक्रियेतील मालमत्ताधारकांची बैठक खासदार विखे यांनी बोलावली होती. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता दिवाण आदी उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, मालमत्ताधारकांशी चर्चा झाली आहे. शासनाने अधिग्रहण केले, तर मालमत्ताधारकांचे २५ टक्के आर्थिक नुकसान होणार होते. मालमत्ताधरकांनी जर हमीपत्र भरून दिले, तर हे नुकसान टाळता येणार आहे. त्यामुळे मी चर्चा केली.
उड्डाणपुलाच्या संपादनात सुमारे २१ जणांची ४ हजार ६५५ चौरस मीटर जागा बाधित होणार आहे. शासकीय जागा २८८८ चौरस मीटर आहे. याव्यतिरिक्त लष्कराच्या हद्दीतील सुमारे ६७०० चौरस मीटर जागाही संपादित करावी लागणार आहे. तातडीने पुलाचे काम सुरू करण्यासाठी बायपासचेही मजबुतीकरण करण्यात येणार आहे.
मी का वाईट होऊ ?
नगरचे राजकारण कळत नाही, असे मी म्हणायचो, पण विधानसभेनंतर मला कळले आहे की येथे सगळेच आतून गोड आहेत. त्यामुळे मी तरी कशाला वाईटपणा घेऊ, असे वक्तव्य करत अंतर्गत विरोधकांनाही डॉ. सुजय विखे यांनी टोला लगावला.
- दिवाळीत नवीन कार खरेदी करणाऱ्यांना मिळणार मोठी भेट! Hyundai कंपनीच्या ‘या’ कारवर मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट
- 12 महिन्यात श्रीमंत व्हायचंय का ? ‘हे’ 4 शेअर्स एका वर्षात 51 टक्क्यांपर्यंत रिटर्न देणार, पहा यादी
- मोठी बातमी ! आता ‘या’ बड्या कंपनीचे डीमर्जर होणार, गुंतवणूकदारांना मिळणार इतके मोफत शेअर्स, रेकॉर्ड डेट आत्ताच नोट करून घ्या
- HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर…! Home Loan च्या व्याज दरात होणार मोठी कपात, किती कमी होणार व्याजदर?
- RBI चा महाराष्ट्रातील आणखी एक मोठा धक्का ! ‘या’ बँकेतील ग्राहकांना पुढील 6 महिने खात्यातून पैसे काढता येणार नाहीत