अहमदनगर :- राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
उड्डाणपुलासह मनपातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार विखे शहरात आले होते. आढाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, जनादेश महायुतीला होता. त्यामुळे शिवसेना-भाजपसह मित्रपक्षांनी सत्ता स्थापन करायला हवी होती. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री व कमी जागा असेल त्यांचा उपमुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते, पण हा निर्णय शेवटी वरिष्ठांचा असतो.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. त्यांना एकरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी, ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.
- ‘या’ जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणी झाल्या दोडक्या ; एकाच टप्प्यात 14 हजाराहून अधिक लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढलं !
- जुलै महिन्यात मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन !
- ….. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई होणार ! राज्य सरकारचा नवा फर्मान पाहिलात का?
- अहिल्यानगरच्या ‘या’ परिसरातील संत्री नागपूरपेक्षाही भारी, परदेशातून जोरदार मागणी तर लवकरच मिळणार जीआय मानांकन
- अहिल्यानगरच्या शेतकऱ्याला जांभळाच्या शेतीने केले मालामाल, अवघ्या २५० झाडांपासून कमवले लाखो रूपये