अहमदनगर :- राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
उड्डाणपुलासह मनपातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार विखे शहरात आले होते. आढाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, जनादेश महायुतीला होता. त्यामुळे शिवसेना-भाजपसह मित्रपक्षांनी सत्ता स्थापन करायला हवी होती. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री व कमी जागा असेल त्यांचा उपमुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते, पण हा निर्णय शेवटी वरिष्ठांचा असतो.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. त्यांना एकरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी, ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.
- मुंबई-पुणेकरांसाठी एकदिवसीय सहलीचे उत्तम पर्याय; विकेंडला ‘शांतता’ देणारी महाराष्ट्रातील ५ पर्यटनस्थळे
- मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा: मुंबई-नवी मुंबई विमानतळांना जोडणारी मेट्रो-8; 35 किमी मार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी
- दहावीनंतर सायन्सचा मोठा निर्णय : पीसीएम, पीसीबी की पीसीएमबी? करिअर ठरवणारी योग्य निवड कशी करावी
- बाबा वेंगांची भविष्यवाणी ठरली खरी? सोन्याच्या दरांनी मोडले सर्व विक्रम, सामान्यांच्या आवाक्याबाहेर सोने
- संघर्षातून संत्रा बागेपर्यंतचा प्रवास; अमरावतीच्या भारती पोहोरकर ठरल्या महिला शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान













