अहमदनगर :- राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
उड्डाणपुलासह मनपातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार विखे शहरात आले होते. आढाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, जनादेश महायुतीला होता. त्यामुळे शिवसेना-भाजपसह मित्रपक्षांनी सत्ता स्थापन करायला हवी होती. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री व कमी जागा असेल त्यांचा उपमुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते, पण हा निर्णय शेवटी वरिष्ठांचा असतो.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. त्यांना एकरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी, ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.
- पोस्ट ऑफिसच्या सर्व बचत योजनांचे व्याजदर जाहीर ! ‘ही’ योजना देते सर्वाधिक व्याज
- सॅमसंगचा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना दणका ! या स्मार्टफोनच्या किमतीत झाली मोठी वाढ, कोणाच बजेट बिघडणार
- प्रतिक्षा संपली ! अखेर Mahindra XUV 7XO लाँच, कसे आहेत फिचर्स आणि किंमत?
- कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! केंद्राचा एक निर्णय अन् 2 दिवसात बाजारभाव 400 रुपयांनी वाढले
- देशभरातील बँका जानेवारी महिन्यातील ‘हे’ तीन दिवस सलग बंद राहणार ! कर्मचाऱ्यांनी पुकारला देशव्यापी संप , मागणी काय?











